Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर… नागपूरचे अर्धे चड्डीवाले करणार काय? सुजात आंबेडकर यांचा राज्यसरकारवर निशाणा

नाशिकच्या शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. तर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

तर... नागपूरचे अर्धे चड्डीवाले करणार काय? सुजात आंबेडकर यांचा राज्यसरकारवर निशाणा
SUJAT AMBEDKAR, DEVENDRA FADNAVIS AND CM EKANTH SHINDEImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 10:34 PM

नाशिक | 9 नोव्हेंबर 2023 : राज्यातील १२ ते २० कुटुंबांनी राज्याच्या पाण्यावर ताबा ठेवला. त्या जोरावर त्यांनी साखर कारखाना, शेती उद्योग यावर ताबा ठेवला. पैसा खिशात घातला. त्याच जोरावर त्यांनी सत्ता पण ताब्यात घेतली. सत्ता आल्यानंतर स्वतःच्या पोराच्या नावावर शिक्षण संस्था केल्या. यामुळे ८० टक्के समाज वंचित राहिला. यात कष्टकरी, गोरगरीब, शेतकरी यांचा समावेश आहे. बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ अशी शिकवण दिली. पण, सरकारचे उद्योग काही वेगळेच सुरु आहेत. अकरा महिने कुठे शाळा चालू असते का? नाही तर काय यांच्या बापाकडे शिकायला जायचं का? असा जळजळीत सवाल वंचित बहुजन युवा आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी शिंदे सरकारला केला.

वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने नाशिक शहरात एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. कंत्राटी भरती रद्द करावी, खाजगीकरण बंद करावे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा. पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करावा या मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता.

मराठा समाजाच्या साखळी उपोषणकर्त्यांची घेतली भेट

सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा सुरु होता. त्यावेळी सुजात आंबेडकर यांनी शहरातील जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूरचे अर्धे चड्डीवाले करणार काय?

मोर्च्याला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी राज्यसरकारवर टीका केली. कंत्राटी भरती म्हणजे सरकार म्हणत आहे की, आम्हाला हे सरकार चालवता येत नाही म्हणून आम्ही हे सरकार भाड्याने चालवायला देत आहोत. ३ हजार पोलीस कंत्राटी भरतीवर घेणार आहे. जर खरंच हे पोलीस भाड्याने घेत असतील. तर मोहन भागवत यांना विचारायचं आहे की, नागपूरचे अर्धे चड्डीवाले करणार काय? सरकार इतकं नीच आणि नालायक आहे की, ते बेरोजगार लोकांकडून पैसे घेत आहे. कंत्राटी भरती ही संविधानानुसार नसेल. यातून आरक्षण मोडीत काढण्याचा देखील प्रयत्न आहे अशी टीका त्यांनी केली.

संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....