आनंद परांजपे यांच्या विरोधात गुन्हे दाखल, मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात वापरले होते अपशब्द, आनंद परांजपे यांना अटक होणार?

आपल्या राज्याची वाटचाल आता पोलिसी राज्याकडे होऊ लागली की काय? अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

आनंद परांजपे यांच्या विरोधात गुन्हे दाखल, मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात वापरले होते अपशब्द, आनंद परांजपे यांना अटक होणार?
आनंद परांजपे
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 11:17 PM

ठाणे : राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. भारतीय दंड विधान 153, 501, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी, डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर दाखल झालेल्या एनसी आता एफआयआरमध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. कागनिझिबल अफेन्समध्ये घेतल्या आहेत. १० पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदवण्यात आले असल्याची माहिती आहे.

आज रात्री त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार येणार असल्याची माहिती आहे. आपल्या राज्याची वाटचाल आता पोलिसी राज्याकडे होऊ लागली की काय? अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. अटक कराच, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

आनंद परांजपे यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली. त्यांनी ठाण्यातील काही पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल झालेत. त्यामुळं माजी खासदार आनंद परांजपे यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणाराय, असं वक्तव्य आनंद परांजपे यांनी केलं. ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गु्न्हे दाखल केले ते खरे गुन्हेगार आहेत, असंही त्यांनी म्हंटलं. आंदोलन करताना आम्ही काही घोषणा दिल्या. त्या असंसदीय नव्हत्या. कोणाची बदनामी त्यातून केली नाही, असंही ते म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.