Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण, तक्रार करुनही पालिकेचं दुर्लक्ष

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या तलावातील मासे मरावे यासाठी रसायन टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे. हे मृत मासे खाण्यासाठी भटके कुत्रे तलावाच्या आसपास फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण, तक्रार करुनही पालिकेचं दुर्लक्ष
KDMCImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 9:44 AM

डोंबिवली : ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा (Khambalpas) तलावातील गेल्या आठ दिवसात मृत माशांच्या दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका (corporation) दुर्लक्ष करीत असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून राहावे लागत आहे. परिसरात साथीचे रोग पसरण्याची भिंती स्थानिकांकडून व्यक्त करत पालिकेने उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे. पालिकेने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक (dombivli thakurli news)संताप व्यक्त करीत आहेत. पालिका या प्रकरणाचा कधी बंदोबस्त करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

डोंबिवली खंबाळपाडा येथील तलावात श्री गणपती आणि इतर देवतांचे विसर्जन नित्यनेमाने होत असते. आता उन्हाळा लागल्यामुळे तलावातील पाणी आटले आहे. सदर तलावातील पाण्याचा रंग बदलला असून ते दूषित झाले असावे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. असं सगळं काही असताना, अचानक आठ दिवसांपासून येथे मासे मेल्यानंतर जी भयंकर दुर्गंधी येते. तशी तलावाच्या आसपास दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत शोध घेतला असता, या तलावातील मासे मृत अवस्थेत आढळल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या तलावातील मासे मरावे यासाठी रसायन टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे. हे मृत मासे खाण्यासाठी भटके कुत्रे तलावाच्या आसपास फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

या तलावातील पाणी काढून साफसफाई करावी याकरिता काळू कोमास्कर आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिका सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र याबाबत कारवाई करण्याबाबत महापालिकेकडून चालढकल करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भरत पाटील यांना विचारले असता, सदर खंबाळपाडा तलावातील मासे मृत झाल्याची तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसापूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी औषध फवारणी केली असल्याचे सांगितले.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.