Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानाचा टक्का वाढला, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया काय ?

राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी आज बुधवारी ( 20 नोव्हेंबर ) काही छोट्या घटना वगळता सुरळीत मतदान पार पडले आहे. राज्यातील 288 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालेले आहे. मतदान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.

मतदानाचा टक्का वाढला, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया काय ?
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 1:27 PM

महाराष्ट्र विधान सभेच्या 288 जागांसाठी आज बुधवार ( 20 नोव्हेंबर ) मतदान पार पडले आहे.या राज्यातील दिग्गजाचे भविष्य मतपेटीत बंद झालेले आहे. राज्यात अनेक छोट्या मोठ्या अनपेक्षित घटना घडल्या असल्या तरी मतदान सुरळीत पार पडलेले आहे. राज्यात मतदानाचा टक्का वाढलेला आहे. राज्यातील इतर भागाची तुलना करता मुंबईत मात्र मतदानाची टक्केवारी कमी आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22 टक्के मतदान झाले आहे.या मतदानानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया आली आहे.

राज्यात 288 विधानसभेच्या जागासाठी बुधवारी मतदान काही घटना वगळता शांततेत पार पडले आहे. या मतदानात राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. राज्यातील बहुमतांशी एक्झिट पोलनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असा अंदाज वर्तवलेला आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयं संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मतदानाची टक्के वारी वाढलेली आहे.त्यामुळे राज्यात महायुतीला फायदा होणार आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपा आणि महायुतीला फायदा होतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

गडचिरोलीत सर्वाधिक मतदान

राज्यातील मतदानाचा टक्केवार यंदा वाढलेली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22 टक्के मतदान झालेले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली येथे झाले असून 69.63 टक्के मतदान झालेले आहे. सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झाले असून 49.07 टक्के झाले आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.