Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज, पाणी, घर नाही, सहा महिने उलटूनही तिवरे धरणग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन नाही

काही महिन्यांपूर्वीच चिपळून येथे तिवरे धरण फुटलं होते. त्यामुळे संपूर्ण गावा पाण्याखाली गेले होते. काही क्षणात अनेकांच्या संसाराची राख (Tivre Dam rehabilitation)  रांगोळी झाली.

वीज, पाणी, घर नाही, सहा महिने उलटूनही तिवरे धरणग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन नाही
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 3:58 PM

रत्नागिरी : काही महिन्यांपूर्वीच चिपळून येथे तिवरे धरण फुटलं होते. त्यामुळे संपूर्ण गावा पाण्याखाली गेले होते. काही क्षणात अनेकांच्या संसाराची राख (Tivre Dam rehabilitation)  रांगोळी झाली. यामध्ये अनेकांची घरं वाहून गेली होती. त्यासोबतच अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते. या घटनेला आज सहा महिने उलटूनही अद्याप सरकारकडून प्रकल्पग्रस्तांना हक्काचे घर मिळालेलं (Tivre Dam rehabilitation) नाही.

तिवरे धरणात ज्यांची घरं वाहून गेली आहेत त्यांना सरकारने तात्पुरते राहण्यासाठी कंटेनरची व्यवस्था करुन दिली आहे. पण या कंटेनरमध्येही वीज, पाण्यीची पुरेशी सोय नाही. त्याोसबतच ते मदतीसाठी आपलं धान्यही पुरवून खात आहेत.

या घटनेत एक 70 वर्षीय आजीनेही आपल्या व्यथा मांडल्या आहेत. या घटनेपूर्वीच आजीची मुलं देवाघरी गेली होती. सध्या त्या एकट्या राहत आहेत. आजींचेही पुनर्वसन झाले. पण व्यवस्थित चालता न येणाऱ्या आजीला अगदी टोकाला कंटेनर दिला आहे. ज्यामुळे त्यांना येजा करण्यास त्रास होत आहे. त्याोसबतच कंटेनरमध्ये दिलेला टेकू सुद्ध अगदी तकलादू आहे. त्यामुळे इथे राहण्यासाठी भीती वाटते, अशी खंत आजींनी व्यक्त केली.

राधिका आजीप्रमाणे या गावातील हिराबाई कनावजे यांचीही परिस्थिती वाईट आहे. कुटुंबात दहा लोकं पण राहायला एकच कंटेनर दिला आहे. तिवरे धरणात कनावजे यांचे घर सुद्धा वाहून गेले होते. तिवरे धरण फुटीत रेशन कार्डही वाहून गेले. त्यामुळे रेशन दुकानावर मिळणारे धान्य बंद झाले. आता जगायचे कसे असा प्रश्न हिराबाईसमोर उभा आहे.

“तिवरे धरण फुटीनंतर आज पाच कुटुंबीय कंटेनरमध्ये राहत आहेत. पुर्नवसन फक्त नावापुरतेच आहे”, असा आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे.

तिवरे धरणग्रस्तांच्या व्यथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी समाजून घेतल्या असून लवकरच यावर सर्व प्राथमिक सुविधा तात्काळ पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं.

'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.