Maharashtra Breaking News LIVE 15 October 2024 : आज राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 14 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
Maharashtra News: राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काही जण करणार याचिका
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काही जण याचिका करणार आहेत… जर १२ च्या आधी सुनावणी झाली तर स्टे पण मिळू शकतो… राज्यपाल आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत… जी नावं जाहीर झालेली आहेत ती कधी सामाजिक क्षेत्रात होती. त्यांनी नावांचीं छाननी केली आहे का? राज्यपालाच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नाही पण आव्हान देण्याची एक प्रक्रिया उपलब्ध आहे.
-
Maharashtra News: टोल नाक्यावर सेना-भाजप आणि मनसे कडून बॅनरबाजी
एकीकडे टोल फ्री केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभाराचे बॅनर लागले आहेत. तर दुसरीकडे मनसेकडून राज साहेब यांचे अभिनंदनचे बॅनर मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाका परिसरात लावण्यात आले आहेत… मनसेच्या आंदोलनाला मोठे यश मुंबईकरांना टोल माफी…
-
-
Maharashtra News: मुलुंड टोल नाक्यावर पुन्हा वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा
हलक्या वाहनांसाठी टोलमाफीची अंमलबजावणी सुरू असतानाही, अवजड वाहनांसाठी टोल वसुली सुरू. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी… वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहून वाहनचालक त्रस्त झाले असून ही परिस्थिती तात्काळ सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे…
-
भाजपने लावलेल्या बॅनरवर अजितदादांचा फोटो वगळला
जळगावत लाडकी बहिण योजनेसंदर्भात भाजपने लावलेल्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो वगळला आहे. बॅनरवर महापुरुषांच्या फोटो नंतर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे भाजपने लावलेल्या या भव्य बॅनरची जळगावात चर्चा रंगली आहे. भाजपने लावलेल्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
महायुतीचे सरकार बहुमताने येणार; या आमदाराला विश्वास
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार बहुमताने येणार, बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी विश्वास व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत जो निरेटिव्ह सेट केला होता तो संपला आहे. त्यामुळे आता महायुती सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं बहुमत मिळेल. महायुती सरकारने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील 80 टक्के माता भगिनी महायुतीला आशीर्वाद देतील, असं राऊत म्हणाले.
-
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद
संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरु आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. निवडणूक आयोगाने जागृक राहावं, असं संजय राऊत म्हणाले.
-
ठाण्यात वाहतूक कोंडी
ठाण्यात आज वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. आनंद नगर जकात नाका ते तीन हात नाका पर्यंत वाहतूक कोंडी झालीय. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची दोन ते तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्यात. हलक्या वाहनांना टोलमुक्त करून देखील वाहतूक कोंडीचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे. रुग्णवाहिकांना देखील वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. काल मध्यरात्रीपासून लहान वाहने टोल फ्री झाली मात्र वाहतूक कोंडी पासून कधी फ्री होणार असा सवाल पुन्हा एकदा वाहनधारक उपस्थित करत आहेत.
-
-
Maharashtra News Live Update : उदय सामंत आणि जरांगे यांच्यात दोन तास चर्चा
मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये मध्यरात्री उदय सामंत आणि जरांगे यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. उदय सामंत आणि जरांगे यांच्यात दोन तास चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
-
Maharashtra News Live Update : दहिसर टोलनाक्यावर मनसेकडून फटाक्यांची आतषबाजी
दहिसर टोलनाक्यावर मनसेची फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. रात्री 12 वाजता दहिसर टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे. रात्री 12 वाजताच दहिसर टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी टोल ओलांडणाऱ्या कार चालकांना मिठाई दिले.
-
Maharashtra News Live Update : टोलमाफीच्या निर्णयानंतर राहुल शेवाळेंकडून पेढे वाटून सेलिब्रेशन
राज्य सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये मुंबई प्रवेश द्वारावर असलेल्या पाचही टोल नाक्यावर वाहनांना टोल माफीचा निर्णय घेतला आणि राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला,रोजच्या रोज प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा मोठा फायदा होणार असल्याने आपल्याला दिवाळी भेट मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. याच अनुषंगाने शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी वाशी टोल नाक्यावर येऊन एकच जल्लोष केला. रात्री 12 वाजता या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने याच वेळी शेवाळे आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने याठिकाणी येऊन प्रवाशांना पेढे वाटून आनंद साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले त्यात लाडकी बहिण आणि टोल माफी आणि इतर अनेक निर्णयामुळे करोडो नागरिकांना याचा थेट फायदा झाला असून, शिंदे सरकारने पुन्हा एकदा सर्व सामान्य जनतेचे सरकार असल्याचे दाखवून दिले आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण मंत्री मंडळाचे आभार व्यक्त करून संपूर्ण राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत असल्याची प्रतिक्रिया शेवाळे यांनी दिली.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यातच राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच महायुतीच्या ७ आमदारांचा शपथविधी होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी विविध धक्कादायक खुलासे होताना दिसत आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
Published On - Oct 15,2024 8:38 AM