Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वर्षानंतर कुठे असतील त्याचा अंदाज येतोय…; अजितदादांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसच्या बड्या नेत्याची सूचक प्रतिक्रिया

शरद पवार यांना मी दैवत मानतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टोला लगावला आहे.

तीन वर्षानंतर कुठे असतील त्याचा अंदाज येतोय...; अजितदादांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसच्या बड्या नेत्याची सूचक प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2025 | 4:43 PM

शरद पवार यांना मी कालही दैवत मानत होतो, आणि आजही दैवत मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. आता यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?  

परिस्थितीनुसार सगळे बदलतात, तो दिवस दूर नाही, तीन वर्षांनी ते कुठं दिसतील याचा अंदाज यायला सुरुवात झाली आहे. त्यांना स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. याची तयारी दोन्ही पक्षांना करावी लागणार आहे, नाही तर अस्तित्व शून्य अशी अवस्था होईल. त्यांनी दैवत म्हणून उल्लेख केला, काकांची पुण्याई त्यांच्या मागे आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करण्यात आली आहे, यावरून देखील वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रमध्ये धावणाऱ्या लालपरीच्या 70 ते 80 टक्के गाड्या नॉन एसी आहेत, त्या बसमध्ये नीट बसता सुद्धा येत नाही. चालक, वाहक चटके सहन करत आहेत, या गाड्या जुन्या झाल्यान अधिक तापतात. त्यातच आता एसटी कर्माचाऱ्यांच्या पगारात केलेली कपात म्हणजे त्यांच्या जखमेवर चोळलेलं हे मीठ आहे. वाहकांना पाणी मिळत नाही, सोयी नाही, सेवा करण्याचं काम ते करतात, सरकारची ऐपत नसताना योजना दिल्या कशाला, त्यांचा भावनाशी खेळू नये, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दहशतवादी आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या तव्वूर राणा याला भारतात आणण्यात आलं आहे. यावर देखील वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आनंद आहे, आज जर दहशतवादी राणाला भारतात आणलं असेल तर दाऊदला का आणलं नाही.  या बॉम्बस्फोटामागे कोण होतं? हे सर्वांना माहीत आहे. जवाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला भारतात आणाव.  महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राणाला भारतात आणून राजकारण करू नये, त्याला फाशी दिली पाहिजे. या गोष्टीसाठी  15 वर्षे लागले. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये त्याचा उपयोग करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील, असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.