Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव ओव्हर फ्लो झाला (Mumbai Modak Sagar lake Overflow)  आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा
Follow us
| Updated on: Aug 19, 2020 | 12:27 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात वाढ होत आहे. मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. आज (18 ऑगस्ट) रात्री 9.24 च्या सुमारास हे तलाव ओसंडून वाहू लागले. (Mumbai Modak Sagar lake Overflow)

गेल्या वर्षी हा तलाव 26 जुलै 2019 ला भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी 2018 ला 15 जुलैला हे तलाव ओव्हर फ्लो झाले होते. मात्र यंदा जून, जुलै या दोन्ही महिन्यात पावसाने फार कमी हजेरी लावली. त्यामुळे अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे.

दरम्यान सुदैवाने ऑगस्ट महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईतील सात तलावांपैकी तीन तलाव भरले आहेत. नुकतंच मुसळधार पावसामुळे मोडक सागर धरण भरले आहे. याआधी तुळशी आणि विहार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट लवकरच टळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 82.95 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सकाळी 6 वा. माहितीनुसार, मुंबईकडे 1200642 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. गेल्यावर्षी यावेळी 94.20 टक्के पाणीसाठा होता. सध्याचा पाणीसाठा पुढचे 315 दिवस म्हणजे पुढचे 10 महिने पुरेल, अशी माहिती पालिकेने दिली आहे. (Mumbai Modak Sagar lake Overflow)

संबंधित बातम्या : 

मुंबईकरांसाठी खूशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो

बारा दिवसात पाणीसाठा दुप्पट, मुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतकं पाणी

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.