Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी खूशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी, तानसा, मोडक सागर या तलावानंतर आता आणखी एक तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. बोरिवलीच्या नॅशनल पार्कच्या हद्द असलेला विहार तलाव (Vihar lake) भरला आहे.

मुंबईकरांसाठी खूशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो
Follow us
| Updated on: Aug 01, 2019 | 9:47 AM

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी, तानसा, मोडक सागर या तलावानंतर आता आणखी एक तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. बोरिवली नॅशनल पार्कच्या हद्दीत असलेला विहार तलाव (Vihar lake) भरला आहे. यामुळे मुंबईकरांवरचे पाणी संकट टळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी एक विहार तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. याआधी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तुळशी, तानसा आणि मोडकसागर हे तीन तलाव आधीच भरले होते. त्यानंतर आता विहार तलावही भरुन वाहू लागला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी विहार तलाव भरुन वाहू लागला.

यंदा सर्वात आधी 12 जुलै रोजी तुळशी तलाव भरून वाहू लागला. त्यानंतर तीनच दिवसांनी 25 जुलै रोजी तानसा धरण भरलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोडकसागरही ओसंडून वाहू लागलं. दुसरीकडे मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे 27 जुलै रोजी उघडण्यात आले. तर भातसा धरणाचे पाच दरवाजे 29 जुलै रोजी उघडण्यात आलेत. दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 85.68 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

तर दुसरीकडे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमधील खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. तर पानशेत धरण 74.49 टक्के, वरसगाव 58. 88 टक्के आणि टेमघर 52.3 टक्के भरले असून या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस कोसळत आहे.

'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.