AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heat Wave : देशात उष्णतेची लाट, वाढत्या गर्मीसह लोडशेडिंगचे संकट, अनेक राज्यात वीज खंडित होण्याच्या मार्गावर? काय आहेत याची 10 कारणं

ज्या राज्यांना हवामान विभागाने आधीच उष्णतेच्या लाटेची सुचना दिली आहे त्याच राज्यात विजेची मागणी ही अधिक वाढली आहे

Heat Wave : देशात उष्णतेची लाट, वाढत्या गर्मीसह लोडशेडिंगचे संकट, अनेक राज्यात वीज खंडित होण्याच्या मार्गावर? काय आहेत याची 10 कारणं
उष्णतेची लाटImage Credit source: tv9
| Updated on: Apr 29, 2022 | 2:09 PM
Share

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात उष्णता (Heat) वाढताना दिसत आहे. तर देशातील अधिकतम राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. तर ज्या राज्यांत पाऊस होत नाही तेथे तर परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यातच हवामान विभागाने (Meteorological Department) देशातील काही राज्यात पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच नागरिकांना अधिक सतर्क राहायला सांगितलं आहे. त्यातच आता अनेक राज्यात सुरू असणाऱ्या विजेच्या (Electricity) संकंटामुळे आगीत तेल ओतण्यासारखी स्थिती झाली आहे. तर काही राज्यांपुढे कोळसा संकंट उभे असल्याच्या बातम्या आल्या आहेत. ज्यामुळे तेथे विजेचे संकंट आणखीन तीव्र झाले आहे. तसेच विजेचे संकंट आता दिल्लीवर ही दिसत असून राज्याचे ऊर्जा मंत्री सत्यंद्र जैन यांनी तात्काळ बैठक घेतली. तसेच त्यांनी केंद्राकडे कोळसा पाठवावा अशी मागणी केली. त्यातच राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात आणि हरियाणासह अनेक राज्यात सुर्य उष्णाता ओकत आहे. त्यातच या राज्यांना कोळशा तुटवड्यामुळे लोडशेडिंगचाही सामना करावा लागत आहे.

काय आहेत याची 10 कारणं

1. वाढत्या गर्मी आणि कोळशाच्या कमीमुळे दिल्लीतील मेट्रो आणि रूग्णालयावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गुरूवारी आलेल्या एका माहितीनुसार दादरी आणि ऊंचाहार येथील विजनिर्मिती स्टेशनमधील वीज निर्मिती थांबल्यामुळे दिल्लीतील मेट्रो आणि रूग्णालयांसह अनेक ठिकानांची वीज २४ तास खंडित होऊ शकते.

2. त्यातच दिल्लीत मागील काही दिवसांपासून तापमान हे 40 डिग्रीपेक्षाही जादा नोंदवले गेले आहे. तर बुधवारी पारा 44 डिग्रीप्रर्यंत गेला होता. त्यातच हवामान विभागाने सांगितले होते की दिल्लीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर पावसाची कोणतीही शक्यता नाही.

3. तर याच्याआधीच हवामान विभागाने देशातील राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांना उष्णतेच्या लाटेवरून ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर हरियाणाच्या गुरूग्राममध्ये एप्रिलमध्ये पहिल्यांदाच 45.6 डिग्री तापमान नोंदविण्यात आलं आहे.

4. राजस्थानमध्ये तर विजेची मागणी ही वाढतच आहे. तर राज्याने सामान्यांचा विचार करत राज्यातील कारखान्यांची वीज कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

5. तसेच ज्या राज्यांना हवामान विभागाने आधीच उष्णतेच्या लाटेची सुचना दिली आहे त्याच राज्यात विजेची मागणी ही अधिक वाढली आहे.

6. त्यात गुजरातमध्ये सध्या गर्मीमुळे वातावरण तंग आहे. येथे अधिकाऱ्यांना वाढत्या गर्मी आणि विजेच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तर जनतेच्या रोषालाही सामोरं जाव लागत आहे. त्यातच गुजरात आरोग्य विभागाचे सचिवांनी, राज्यातील रूग्णालयांना उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी वॉर्ड तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

7. तर भयावह बाब म्हणजे एएफपी च्यानुसार २०१० पासून आतापर्यंत ६००० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

8. तर देशात वाढत्या गर्मी आणि उष्णतेच्या लाटेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेतावनी दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले, देशात तापमान वाढत आहे आणि हे वेळेच्या आधी होत आहे. त्यातच आपण अनेक ठिकाणी आगीच्या घटना पाहत आहोत. त्यात इमारती, रूग्णालय आणि जगलांचाही समावेश आहे.

9. त्यातच देशातील शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. लोडशेडिंगमुळे त्यांना शेताला पाणी देता येत नाही.

10. तर पंजाबचे ऊर्जामंत्री हरभजन सिंग यांनी म्हटले होते की, मागील वर्षीपेक्षा यावेळी विजेची मागणी ही 40 टक्क्यांनी वाढली आहे. तर विरोधी पक्षांनी आरोप केला की, राज्यात 10 ते 13 तास लोडशेडिंग केली जात आहे. तेही ग्रामीणभागात.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.