Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI तर गेम चेंजर; न्यायालयात त्याचा वापर करणार का? काय म्हणाले सरन्यायाधीश

AI CJI Chandrachud: कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (AI) देशाचे सरन्यायाधीशांनी मोठे वक्तव्य केले आहे. एआय हे भविष्यात गेम चेंजर ठरु शकते, असे त्यांना वाटते. पण यासोबतच या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी त्यांनी धोके ओळखण्याचा सल्ला पण दिला. भारत आणि सिंगापूर न्यायीक परिषदेदरम्यान त्यांनी एआयविषयी मत मांडले.

AI तर गेम चेंजर; न्यायालयात त्याचा वापर करणार का? काय म्हणाले सरन्यायाधीश
न्यायापालिकेत एआयचा वापर होणार का?
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 3:19 PM

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठी क्रांती आणू शकते. हा आधुनिक तंत्रज्ञान गेम चेंजर असल्याचे मत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी मांडले. एआयचा भारतीय न्याय व्यवस्थेत वापर केल्या जाऊ शकतो, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत एआयविषयी जवळपास प्रत्येक क्षेत्रात चर्चा सुरु आहे. एआय किती फायदेशीर आणि किती नुकसानकारक आहे, याची चर्चा सुरु आहे. याबाबत देशाचे सरन्यायाधीशांनी पण त्यांचे मत मांडले आहे. काय म्हणाले चंद्रचूड…

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भारत आणि सिंगापूर न्यायीक परिषदेत तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांचे मत मांडले. त्यांनी एआयच्या आवश्यकतेवर पण भर दिला. न्यायीक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि एआयचा वापर हा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याचा काळ हा बदल स्वीकारण्याचा आहे, आपल्याला तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर कसा करता येईल हे बघावे लागेल, असे ते म्हणाले. त्यांनी एआयच्या वापरासंबंधी इशारा पण दिला आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर होता कामा नये, असा इशारा पण त्यांनी दिला.

एआयचा चुकीचा वापर

हे सुद्धा वाचा
  1. सरन्यायाधीशांनी एआयच्या चुकीच्या वापरावर चिंता व्यक्त केली. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर व्हायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले. एआयमुळे श्रीमंत आणि गरिबांतील दरी अधिक रुंदावणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
  2. अनेक उच्च न्यायालयात AI चा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. एआयच्या मदतीने लाईव्ह ट्रान्स्क्रिप्शन सेवा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही सेवा सध्या हिंदी भाषेसह अन्य 18 प्रादेशिक भाषामध्ये पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
  3. अनेक कामात एआयचा मोठा उपयोग होऊ शकतो, असे ते म्हणाले. यामध्ये डॉक्युमेंट रिव्ह्यू, केस मॅनेजमेंट, शेड्युलिंग यांचा समावेश आहे. एआयच्या मदतीने प्रशासनाचे काम सुलभ होणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पेपरवर्क कमी होईल. पैशांसह वेळेची बचत होईल. तर याचिकाकर्त्यांना जलद न्यायदानासाठी पण एआय मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.