Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीवर कोरोनाचे पुन्हा संकट”;एकाच दिवसातील रुग्णांच्या आकड्यामुळे प्रशासनाची धावपळ

महाराष्ट्रात 105, तेलंगणात 93, कर्नाटकात 57, गुजरातमध्ये 54 आणि दिल्लीत 19 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे, गेल्या एका आठवड्यापासून भारतात कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली

दिल्लीवर कोरोनाचे पुन्हा संकट;एकाच दिवसातील रुग्णांच्या आकड्यामुळे प्रशासनाची धावपळ
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 11:15 PM

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत कोरोनामुळे पु्न्हा एकदा कोरोनामुळे दिल्लीत चिंतेचं वातावरण पसरले आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे आता आरोग्यखाते ही सतर्क झाले आहे. गुरुवारी दिल्लीत कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्या 100 च्या पुढे गेली असल्यामुळेच भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्ली सरकारच्या दिल्ली आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 23 मार्च रोजी कोरोनाचे 117 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतील संसर्ग 4.95 टक्क्यांवर पोहचला असला तरी गुरुवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मागील आकडेवारी पाहिल्यास, 22 मार्च रोजी दिल्लीत कोरोनाचे 84 नवीन रुग्ण आढळले होते. तर संसर्ग दर 5.08 टक्के होता. तर 21 मार्च रोजी दिल्लीत कोरोनाचे 83 नवीन रुग्ण आढळले असून त्या्दिवशी 1 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

हा संसर्ग दर 5.83 टक्के होता. गेल्या 24 तासांत दिल्लीत 2362 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी 63 रुग्ण बरे झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत सध्या कोरोनाचे एकूण 346 रुग्ण आहेत, तर त्यापैकी 212 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये असून 17 रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

भारतातील रुग्णांची एकूण संख्या

देशात गेल्या 140 दिवसांमध्ये सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. गुरुवारी भारतात कोरोनाचे 1,300 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील एकूण रुग्णांची संख्या 46, 99,418 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एका दिवसात कोरोनाच्या नवीन रुग्णांची ही संख्या गेल्या 140 दिवसांतील सर्वाधिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कोरोना वाढण्याचे मुख्य कारण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की ओमिक्रॉन XBB.1.16 यामुळे देशातील संसर्गाचे मुख्य कारण असू शकते, परंतु आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ किंवा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत XBB.1.16 शोधण्यासाठी 344 रुग्णांची नोंद झाली होती.

या राज्यात रुग्णसंख्या वाढली

महाराष्ट्रात 105, तेलंगणात 93, कर्नाटकात 57, गुजरातमध्ये 54 आणि दिल्लीत 19 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे, गेल्या एका आठवड्यापासून भारतात कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये कोविड-19 चे रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.