AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच कुठूनही मतदान करण्याचा हक्क मिळणार? कसा? चाचपणी सुरु

भारतीय निवडणूक आयोग एक महत्तपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना मतदान करता येणं शक्य आहे का?, याची चाचपणी सध्या निवडणूक आयोग करत आहे.

लवकरच कुठूनही मतदान करण्याचा हक्क मिळणार? कसा? चाचपणी सुरु
| Updated on: Jan 25, 2021 | 9:27 AM
Share

नवी दिल्ली  :  आपल्याला जर मतदान करायचं असेल तर ज्या मतदारसंघात आपलं नाव आहे किंवा नोंदणी आहे तिथे जाऊन आपल्याला मतदान करावं लागतं. यामध्ये नोकरी करणाऱ्यांना किंवा कामानिमित्त बऱ्याच वेळा बाहेर असणाऱ्या मतदारांना मतदान करणं जमतं असं नाहीच. मात्र आता भारतीय निवडणूक आयोग एक महत्तपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना मतदान करता येणं शक्य आहे का?, याची चाचपणी सध्या निवडणूक आयोग करत आहे. (Election Commission trial To Vote From Any Centre )

देशातील कोणत्याही मतदानकेंद्रावर जाऊन मतदाराला आपलं मत नोंदवता येण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाचं काम सुरु आहे किंबहुना त्याची ट्रायल सुरु असल्याचं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.  राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला सुनील अरोरा यांनी भविष्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा दृष्टीकोन देशवासियांच्या समोर ठेवला.

आम्ही आयआयटी-मद्रास आणि इतर संस्थांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रिमोट वोटिंग संधोधन प्रकल्प सुरु केला आहे. आमचा हा प्रकल्प प्रगतीपथावर असून त्याची ट्रायलही सुरु झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.

प्रत्येक निवडणुकीत हजारो लोकांना भौगोलिक अडथळ्यामुळे, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा इतर कारणांमुळे नोंद असलेल्या मतदारसंघात जाता येत नाही. अशा मतदारासांसाठी निवडणूक आयोगाचा हा निर्णय संजीवनी ठरणार आहे. देशातील लाखो मतदारांना याचा फायदा होणार आहे. जर देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करण्याचा अधिकार बजावता आला, तर मतदानाची टक्केवारीही वाढण्यास मदत होणार आहे.

मतदान ओळखपत्र आता मोबाईलवर

भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आली. याचं दिनाचं औचित्य साधून निवडणूक आयोग दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करतो. आजपासून (सोमवार) भारत निवडणूक आयोगाचे ई मतदार ओळखपत्र (ई ईपिक) वाटप सुरु होणार असून मतदारांना त्यांचे ओळखपत्र मोबाईल अथवा संगणकावर डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त बलदेस सिंह यांनी दिली. (Election Commission trial To Vote From Any Centre )

हे ही वाचा

मतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही? ‘हे’ आहेत पर्याय

‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, राहुल गांधींचा आरएसएसवर हल्ला

अशोक चव्हाणांना सोळा नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे वेध?

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.