मंडपात वधूचा चेहरा बघताच वर भडकला, धोका-धोका म्हणत थयथयाट !
लग्नाची सगळी तयारी झाली होती, वरमाळा घालण्याची वेळ समीप आली होती. मात्र तेवढ्याने नवऱ्या मुलाने अचानक लग्नासाठी नकार दिला. आपली होणारी बायको बदलल्याचा आरोपच त्याने करत आपल्याला धोका मिळाल्याचं म्हटलं. मात्र त्यामुळे मोठा गोंधळ माजला. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं, तिथेही अनेक तास गोंधळ सुरू होता. अखेर पुढे काय झालं ?
वाजत गाजत वरात वधूच्या घरी पोहोचली. औक्षण करून, टिळा लावू वराचं ल्वागतही करण्यात आलं. अखेर लग्नघटिका समीप आली, वरमाळा घालण्यासाठी वधू स्टेजवर आली खरी पण तिचा चेहरा पाहताच होणारा वर भडकला, त्याचा चेहरा अक्षरश: लालेला झाला. आणि तो ओरडू लागला. हे काय आहे , माझी बायको कुठे आहे आणि ही मुलगी कोण ?असा प्रश्न विचारताना तो संतप्त झाला. मात्र त्याचं हे बोलणं ऐकून लग्नघरातील मंडळी हक्काबक्का होऊन एकमेकांकडे पाहू लागली. कोणाला काही कळेचना. माझं जिच्याशी लग्न ठरलं होतं, ती ही मुलगी नाही, असा दावा वराने केला.
बघता-बघता गदारोळ झाला. वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच वाद इतका वाढला की संतप्त गावकऱ्यांनी लग्नाची वरातच ओलीस ठेवली. दरम्यान कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ओलिसांची सुटका केली. यानंतर त्यांनी वधू-वर दोघांनाही पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्रामामध्ये वराने पूर्वनियोजित वधूशी लग्न करण्यासही लग्नास नकार देण्यास सुरुवात केली. तो म्हणाला- आमची फसवणूक झाली आहे. आता मी खऱ्या नवरीशी लग्नही करणार नाही, असं म्हणत त्याने गोंधळ घालण्यास सुरूवात केली.
पोलीस स्टेशनमधील मंदिरातच लागलं लग्न
अखेर पोलीस ठाण्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांना शांत केले. त्यांच्या समजवण्यानंतर अखेर दोन्ही पक्षांनी लग्नाला होकार दिला. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत वराने पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या संतोषी माता मंदिरातच त्या वधूसोबत सप्तपदी घेतल्या आणि लग्न केलं.
कसा तयार झाला वर ?
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बरूराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुमनगर बखरी गावचे आहे. गायघाट येथून लग्नाची वरात येथे आली होती. लग्नाचे विधी सुरू झाले आणि लग्नातील पाहुणे जेवण करत होते. दुसरीकडे वरमाळा घालण्याचा विधी चालू होता. पण तेवढ्यात वराच चढलेला आवाज ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. वधूचा चेहरा पाहताच त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे लग्नसमारंभात बराच गदारोळ झाला होता. लग्नातील पाहुण्यांना ओलीस ठेवण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ओलिसांची सुटका केली. त्यानंतर याच गोष्टीवरून पोलीस ठाण्यात गदारोळ झाला. मात्र समजावून सांगितल्यानंतर वराची समजूत पटली.
त्यानंतर ज्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं होतं, त्याच मुलीशी वराचे पोलीस ठाण्याच्या आवारातील मंदिरातच लग्न लावून देण्यात आले. लग्नाचे विधी आटोपल्यानंतर सकाळ होताच पोलीस ठाणे प्रभारींनी नव-या जोडप्याला आशीर्वाद देऊन निरोप दिला. दोन्ही पक्षांची समजूत घातल्यानंतर वधू-वराचा विवाह लावण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितलं.