Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित, असं मी कधी म्हटलंच नव्हतं: अमित शाह

अमित शाह यांनी शेतकऱ्यांना बुराडी मैदानावर जमण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल, असा पवित्रा केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकरी संघटनांना हा प्रस्ताव मान्य नाही. | farmers protest

शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित, असं मी कधी म्हटलंच नव्हतं: अमित शाह
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 5:07 PM

हैदराबाद: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनावर (Farmers protest) रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांचे हे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित असल्याचे मी कधीच म्हटले नव्हते. आतादेखील माझे तसे मत नाही, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले. (Amit Shah reaction on Chaol Delhi Farmers protest)

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढला आहे. दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर म्हणजे सिंघु-टकरी येथे सध्या शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी संघटना दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर अमित शाह यांनी शेतकऱ्यांना बुरारी मैदानावर जमण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल, असा पवित्रा केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकरी संघटनांना हा प्रस्ताव मान्य नाही.

या वादात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांनी बिनशर्त चर्चा करावी, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकरी संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचा जमाव अडवण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. अश्रुधुर, वॉटर कॅनन आणि पोलिसी बळाचा वापर करत शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत.

आता सिंघु बॉर्डरवर पोलीस आणि सुरक्षा दलांनाच दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांचा वेढा पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरन तारण आणि अमृतसरवरुन ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांचा नवा जमाव याठिकाणी दाखल झाला आहे. ते दिल्लीहून सिंघु येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा दलांच्या दोन्ही बाजुंना शेतकऱ्यांचे जमाव उभे ठाकले आहेत.

संबंधित बातम्या:

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील; पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास

‘अमित शाह यांचं आवाहन स्वीकारा’, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची आंदोलक शेतकऱ्यांना विनंती

आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून चर्चेचं आवाहन, सर्व समस्या आणि मागण्यांवर संवाद साधण्यास सरकार तयार

(Amit Shah reaction on Chalo Delhi Farmers protest)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.