Rahul Gandhi : …तर नरेंद्र मोदी यांचा दोन ते तीन लाख मतांनी पराभव निश्चित होता, राहुल गांधी यांचा सर्वात मोठा दावा

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi : ...तर नरेंद्र मोदी यांचा दोन ते तीन लाख मतांनी पराभव निश्चित होता, राहुल गांधी यांचा सर्वात मोठा दावा
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 10:06 PM

लोकसभा निवडणुका पार पडल्या असून एनडीए सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इंडिया आघाडीने भाजपला सत्तेत येण्यापासून रोखलं, मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेत भाजपने एनडीए सरकार स्थापन केलं. भाजपलाही काही राज्यात कमी प्रमाणात मतदान झालं. मोदी स्वत: एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. याचाच धागा पकडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

प्रियंका गांधी वाराणसीत लढल्या असत्या तर आज भारताच्या पंतप्रधानांचा वाराणसी निवडणुकीत दोन-तीन लाख मतांनी पराभव झाला असता. मी हे अहंकारातून बोलत नाही, कारण भारतातील जनतेने पंतप्रधानांना संदेश दिला आहे की तुमचे राजकारण आम्हाला आवडले नाही आणि आम्ही विरोधात आहोत. आम्ही द्वेषाच्या, हिंसेच्या विरोधात आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि सदस्य आणि अमेठी आणि रायबरेलीच्या जनतेचे आभार मानू इच्छितो. यावेळी काँग्रेस पक्ष अमेठी, रायबरेली, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशात एकदिलाने लढला.तुम्ही संपूर्ण देशाचे राजकारणच बदलून टाकले आहे. संविधानाला हात लावला तर बघा जनता काय करतील, असा संदेश जनतेने देशाच्या पंतप्रधानांना दिला असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

पाहा व्हिडीओ:-

दरम्यान, राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी राहुल गांधी यांनी विजय मिळवला. रायबरेली मतदारसंघात त्यांनी सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं गांधी म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.