AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : पाऊस तर कधी उन्हाळा, कधी हिवाळ्यातही पडतो, पण मान्सूनच्या पावसाचे गुण अस्सल ते अस्सलच! थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम!

'स्कायमेट' हा हवामान संस्थेने यंदा मान्सून हा सामान्य राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच यंदा सरासरीच्या तुलनेत 94 ते 104 टक्के पाऊस बरसणार आहे. जर मान्सूनची स्थिती सामान्य राहिली तर शेती उत्पादनात वाढ ही ठरलेली आहे. गेल्या काही वर्षात नियमित आणि वेळेत नाही पण सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ ही झालेलीच आहे. यंदा तर अधिकच्या पावसामुळे उन्हाळी पिकेही शक्य झाली होती.

Monsoon : पाऊस तर कधी उन्हाळा, कधी हिवाळ्यातही पडतो, पण मान्सूनच्या पावसाचे गुण अस्सल ते अस्सलच! थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम!
महाराष्ट्रात पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरणImage Credit source: tv9
| Updated on: May 20, 2022 | 6:28 AM
Share

मुंबई :  (Monsoon) मान्सून हा अनिश्चित आणि अनियमित स्वरुपाचा असला तरी त्याच्या असण्याने आणि नसण्याने थेट (Impact on the economy) अर्थव्यवस्थेवरच परिणाम होऊ शकतो. आता मान्सूनचा पाऊस आणि अर्थव्यवस्था यांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या (Agricultural) शेती व्यवसायाचा खरा आधार हा मान्सूनच आहे. त्याच्या आगमनावरही सर्वकाही अवलंबून आहे. भारतातील ग्रामीण भागातील बहुसंख्यलोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. मान्सून आणि शेती या दोन गोष्टींचा घनिष्ठ संबंध आहे. इतकेच नव्हे तर कृषी क्षेत्राचा डोलाराच हा मान्सूनवर उभा आहे. शेतीचे भवितव्यतच हे मान्सूनच्या वेळापत्रकाप्रमाणे चालते.

सामान्य़ मान्सूनचा शेती व्यवसयावर परिणाम

‘स्कायमेट’ हा हवामान संस्थेने यंदा मान्सून हा सामान्य राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच यंदा सरासरीच्या तुलनेत 94 ते 104 टक्के पाऊस बरसणार आहे. जर मान्सूनची स्थिती सामान्य राहिली तर शेती उत्पादनात वाढ ही ठरलेली आहे. गेल्या काही वर्षात नियमित आणि वेळेत नाही पण सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ ही झालेलीच आहे. यंदा तर अधिकच्या पावसामुळे उन्हाळी पिकेही शक्य झाली होती. त्यामुळे मान्सूनच्या केवळ वातावरणावरही बरेच काही अवलंबून आहे.

यंदाच्या वेळेत आगमनाचा असा हा फायदा

यंदा मान्सून सामान्य तर राहणारच आहे पण वेगळेपण म्हणजे तो वेळेत दाखल होत आहे. याचा देखील शेती उत्पादनावर आणि शेती व्यवसायावर परिणाम होत असतो. केवळ वेळेत मान्सून दाखल झाल्यामुळे वेळेत खरिपाच्या पेऱण्या होऊन उत्पादनात वाढ देखील शक्य आहे. जर पावसाने हुलकावणी दिली तर मात्र, दुबार पेरणी, उत्पादनात घट, उत्पादनावर अधिकचा खर्च यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मान्सूनच्या पावसावरच शेती व्यवसाय आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्था अवलंबून आहे.

देशाच्या जेडीपीमध्ये 17 टक्के वाटा शेतीचा

देशातील निम्म्याहून अधिक जनतेचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मान्सूनच्या अंदाज केवळ शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी महत्त्वाचा आहे असे नाही तर यामुळे इतर उद्योगधंदे देखील अप्रत्यक्षरीत्या प्रभावित होत असतात. शेती क्षेत्रातील कोणताही घटक असो त्यावर पावसाचा प्रभाव कायम राहिलेला आहे. शेतीच्या उत्पदनात वाढ होण्यासाठी मान्सून सामान्य किंवा सामान्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.