Naxalism Explainer : देशात नक्षलवादाची पाळंमुळं किती घट्ट? 1 वर्षात खरंच नक्षाल्यांचं कंबरडं मोडणार? काय आहेत अजून आव्हानं
Naxalist Movement : भारतात नक्षलवादाची पाळंमुळं खोदण्याचे काम सुरू आहे. अनेक राज्यात मोठ्या कारवायांनी नक्षली चळवळ खिळखिळी झाली आहे. कधी काळी झपाट्याने फोफावलेल्या या पोटातील अल्सरचा नायनाट करण्यासाठी मोठी पावलं टाकण्यात आली आहेत.

आदिवासी, दुर्बल घटकांवर अन्याय करण्यात येत असल्याची ओरड करत नक्षलवाद देशातील अनेक राज्यात झपाट्याने पसरला. मिसुरडे ही न फुटलेल्या तरुणांच्या हातात बंदुका आल्या. सुरुवातीला नक्षलांच्या विचाराने अनेक तरुण-तरुणी भरकटले. पण नंतर यातील फोलपणा समोर आला. अनेकांनी बंदुका खाली ठेवल्या. अनेकांनी हा जहाल मार्ग सोडला. त्यातच गेल्या तीन दशकात भारताने झपाट्याने प्रगतीचा आलेख उंचावला आहे. त्यातच केंद्रातील मोदी सरकारने नक्षलवादी चळवळीविरोधात गेल्या काही वर्षात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. अनेक राज्यात जोरदार चकमकी झडत आहे. यापूर्वी अनेकांना शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्यांनी ही संधी दवडली, त्यांचा खात्मा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जिल्हे आता नक्षलवाद मुक्त होत आहे. पण एका वर्षात खरंच देशातील नक्षलवाद समाप्त होईल का? ...