Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET-UG 2024 : या एका प्रश्नाने पु्न्हा घातला घोळ; 13 लाख विद्यार्थ्यांची बदलणार पुन्हा रॅकिंग

Supreme Court : नीट युजी पेपर लीक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फेर परीक्षा होणार नाही, हे स्पष्ट केले. आता 13 लाख विद्यार्थ्यांच्या मानांकनात यामुळे फेरबदल होईल. या एका प्रश्नावरुन हे महाभारत सुरु झाले आहे. कोणता आहे हा प्रश्न?

NEET-UG 2024 : या एका प्रश्नाने पु्न्हा घातला घोळ; 13 लाख विद्यार्थ्यांची बदलणार पुन्हा रॅकिंग
नीट युजीसी 2024
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 10:28 AM

NEET-UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला. त्यातच आता याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. फेर परीक्षा होणार नाही, हे कोर्टाने स्पष्ट केले आहे. एनटीएने न्यायालयासमोर डेटा ठेवला होता. त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल दोन दिवसात जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी 4 जून रोजी निकाल जाहीर झाला. त्यानंतर 1 जुलै रोजी एनटीएने सुधारीत निकाल जाहीर केला होता.

13 लाख विद्यार्थ्यांच्या मानांकनात बदल

सर्वोच्च न्यायालयात निकालात स्पष्ट केले आहे की या निर्णयामुळे 13 लाख विद्यार्थ्यांच्या मानांकनात फेरबदल होईल. एकाच प्रश्नाचे दोन उत्तरे गृहीत धरल्याने हा प्रकार समोर येत आहे. काही विद्यार्थ्यांनी एकाच प्रश्नाला दोन पर्याय देण्याच्या एनटीएच्या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान दिले होते. विद्यार्थ्यांची नाराजी लक्षात घेत न्यायालयाने योग्य पर्याय, योग्य उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.

हे सुद्धा वाचा

IIT दिल्लीने दिला अहवाल

या प्रश्नावर IIT दिल्लीतील तज्ज्ञांनी न्यायालयात उत्तर दाखल केले. त्यानुसार या प्रश्नाचे एकच उत्तर योग्य होते. दोन नाही. ‘अणू विद्युतीयदृष्ट्या तटस्थ असतात. कारण त्यांच्याकडे धन आणि ऋण समान रुपाने भारीत होतात’, हे उत्तर बरोबर असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

तर ‘प्रत्येक मुलद्रव्याचे अणू स्थिर असतात आणि ते त्याचे खास वर्णपट उत्सर्जित करतात’ हा दुसरा पर्याय होता. यापूर्वी NTA ने दोन पर्यायांपैकी कोणत्याही एकाची निवड करणाऱ्यांना 4 गुण देण्याची घोषणा केली होती. जवळपास 9 लाख विद्यार्थ्यांनी पहिला पर्याय तर 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दुसरा पर्याय निवडला होता. आता त्यांना एक गुणाचे नुकसान सहन करावे लागणार आहे.  या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षा होणार नसल्याचा निकाल दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पर्याय उरला नाही. जवळपास 13 लाख विद्यार्थ्यांच्या मानांकनात बदल होणार आहे.

कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन
कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन.
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले.
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.