Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणातील आंदोलन पेटलं, संजय राऊत भडकले, कोकण कनेक्शन सांगत दिलं खुलं आव्हान, सरकारवर घणाघाती टीका

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रत्नागिरी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारसह केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

कोकणातील आंदोलन पेटलं, संजय राऊत भडकले, कोकण कनेक्शन सांगत दिलं खुलं आव्हान, सरकारवर घणाघाती टीका
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 4:38 PM

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रत्नागिरी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षण प्रकरणी आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या झटापटीवरुन आक्रमक झाले आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यानंतर सर्वेक्षण सुरू असल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल करत थेट केंद्र सरकारवर निशाणा साधत शिंदे-फडणवीस सरकारला प्रश्न विचारले आहे. संजय राऊत यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला खुलं आव्हान देत असतांना जुना इतिहास सांगितला आहे. त्यामुळे पुढील काळात हे आंदोलन अधिकच पेटणार असं चित्र निर्माण झाले आहे.

संजय राऊत म्हणाले, पोलिसांनी रत्नागिरी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वेक्षण करतांना अमानुष लाठीचार्ज केला आहे. महिला आणि लहान मुलांना बदडून काढलं आहे. खासदार विनायक राऊतांना अटक केलीय. एकीकडे चर्चेतून तोडगा काढायचं सरकार म्हणतेय आणि दुस-या बाजूला आंदोलकांना बदडून काढले जात आहे.

तुम्ही गोळ्या झाडून रक्त सांडून तिथे रिफायनरी उभी कराल, कारण हा दिल्लीवरून आलेला आदेश आहे. खाजगी लोकांनी तिथे जमीन खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आहे. प्रत्येकानं फायदा तोटा हिशोब केला आहे. ही लोकशाही नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मोगलाईचा आदेश देऊन ते परदेशात गेले.

हे सुद्धा वाचा

शिवरायाच्या भूमीत महिलांना मारहाण केली जातेय. अन् तिथे मॅारिशसला शिवाजी महारांजांच्या अनावरनासाठी जाताय. हा कोकणी जनतेवरचा अत्याचार सहन केले जाणार नाही, कारण शिवसेनेवर कोकणी जनतेने प्रेम केल आहे. त्यामुळे आम्ही आंदोलकांच्या बरोबर आहोत असेही राऊत म्हणाले.

गृहमंत्री मॅारिशसला बसून आदेश देताहेत. मुख्यमंत्र्यांची इच्छा असती तर आदेश थांबले असते. दिल्लीतल्या मोगलांचा आदेश आहे. यापूर्वी कोकणात अशा पद्धतीनं आंदोलन झालं नाही. स्टरलाईट , नाणार, जैतापूर आंदोलन झाले पण जनतेवर अमानुष मारहाण यापूर्वी कधी झाली नाही.

आंदोलक पाकिस्तान मधून आलेत का? ते रशियातून आले आहेत का? आंदोलनकर्ते रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरील नाहीत. आपल्या नातेवाईकांवर अत्याचार होऊ नये असे वाटते म्हणून ते आले होते. जमीनी कोणाच्या नावावर आहे ते उदय सामंत यांनी सांगावे असेही आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

आमच्या भूमिपुत्रांच्या डोकी फोडताय? कोणताही विनाशकाला प्रकल्प टिकला नाही. उद्या गोळ्या झाडतील. परदेशी कंपन्या आहेत त्यात व्यवहार झाले आहेत. हे कमिशन वर जगताहेत. उदय सामंतांनी कोणाची सुपारी घेतलीय ते स्पष्ट करावं असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.