Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिणेतील हे राज्य भारतापासून तोडण्याचा डाव; राज्यपालांच्या वक्तव्याने देशभर खळबळ, कुणावर केला गंभीर आरोप?

Governor R N Ravi : भाजपमुक्त राज्य करण्याच्या नादात काही राज्य भारत मुक्त होण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. काही राजकीय मंडळी ही राज्य देशापासून तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोपच राज्यपालांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी पण दक्षिण भारतात असे प्रयोग झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दक्षिणेतील हे राज्य भारतापासून तोडण्याचा डाव; राज्यपालांच्या वक्तव्याने देशभर खळबळ, कुणावर केला गंभीर आरोप?
हे राज्य भारतापासून तोडण्याचा डाव, राज्यपालांचा गंभीर आरोप काय?
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 10:01 AM

राज्यपाल आर एन रवी यांच्या वक्तव्याने तामिळनाडूतच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तामिळनाडूला भारतापासून तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तीन भाषांच्या सूत्राला तामिळनाडुने विरोध केला आहे. तर देशातील इतर 27 राज्यांनी हे सूत्र स्वीकारले आहे. त्याचवेळी राज्यपालांच्या या विधानाने आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहे. अर्थात राज्यपालांचा रोख कुणाकडे आहे आणि का आहे हे वेगळं सांगायला नको.

राज्यपालांनी टोचले राज्य सरकारचे कान

राज्यपाल आर. एन. रवी यांनी शुक्रवारी हे स्फोटक वक्तव्य केले. हिंदी महिना साजरा करण्याच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी त्यांनी राजकीय पक्षांवर कठोर शब्दात टीका केली. हिंदी लादण्यात येत असल्याचा ते केवळ बहाणा, ढोंग करत आहे. त्यांना भाषेच्या विरोधा आडून संवाद तोडायचा आहे. त्यांची अत्यंत जहाल आणि विषारी धोरण आहे. त्यांना भारतापासून तामिळनाडू राज्याला तोडायचे आहे. पण या कामात त्यांना मिळणार नाही, असे त्यांनी फटकारले.

हे सुद्धा वाचा

भारताचे तुकडे करता येणार नाही

तामिळनाडूला देशापासून तोडण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. हे राज्य स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पण असे मनसुबे रचणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की भारताचे तुकडे करता येणार नाही, असे त्यांनी फटकारले. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी शुक्रवारी दुरदर्शनच्या चेन्नई कार्यालयात हिंदी महिन्याचा समारोपीय कार्यक्रमात राज्य गीत ‘तमिल थाई वज़्थु’ ची एक ओळ राज्यपालांनी म्हटली नसल्याचा आरोप केला आहे.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यात संघर्ष

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचे दिसून येते. दोघांमध्ये संघर्ष विकोपाला गेला आहे. कार्यक्रमात राज्य गीत ‘तमिल थाई वज़्थु’ ची एक ओळ राज्यपालांनी म्हटली नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपालांनी राष्ट्रीय एकतेचा अवमान केल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल पुढे जात, राज्यपालांवर वर्णद्वेषी असल्याचा आरोप केला.

शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.