Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G-20 New Delhi Summit 2023 : शिखर परिषदेच्या पहिल्या ‘वन अर्थ’ सत्रात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?; वाचा…

PM Narendra Modi Tweet About G-20 New Delhi Summit 2023 : G-20 परिषदेच्या 'वन अर्थ' सत्रात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?; कोणत्या मुद्द्यांवर कुणी काय मतं मांडली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर सांगितलं... पाहा काय म्हणाले...

G-20 New Delhi Summit 2023 : शिखर परिषदेच्या पहिल्या 'वन अर्थ' सत्रात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?; वाचा...
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 4:10 PM

G-20 New Delhi Summit 2023 : आंतराष्ट्रीय राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज G-20 ची शिखर परिषद होत आहे. आपल्या देशात ही परिषद आयोजित आहे. राजधानी दिल्लीत जगभरातील महत्वाचे नेते आलेत. सकाळी साडे नऊ वाजता हे महत्वाचे परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या भारत मंडपमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली. एक-एक करून हे नेते भारत मंडपमध्ये आले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नेत्यांचं स्वागत केलं. यानंतर साडे दहा वाजता पहिल्या वन अर्थ या चर्चा सत्राला सुरुवात झाली. या परिषदेतील पहिल्या सत्रात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? याची जागतिक वर्तुळासह भारतातील लोकांनाही उत्सुकता होती. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेतील मुद्दे कोणते होते याची माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत G-20 ची शिखर परिषदेसंदर्भात माहिती दिली आहे. नेमके कोणते मुद्दे चर्चिले गेले याची त्यांनी माहिती दिली आहे. मानव केंद्रीत विकासाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्व आहे. याच मुद्द्यावर आजच्या या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेच्या पहिल्या सत्रात मानव केंद्रीत विकासाला चालना देण्यावर भर देण्यात आला, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.

युद्धाने विश्वासाच्या व्याख्येचा अर्थ अधिक गडद झाला. आपण सगळ्यांनी मिळून ग्लोबल ट्रस्ट डेफिनेशनला एका दृढ विश्वासात परावर्तीत केलं. सध्याचा काळ हा सोबतीने चालण्याचा आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ हा विकासाचा मंत्राही पंतप्रधान मोदी यांनी सांगितला आहे.

भारताला या G-20 परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना देशातील आणि बाहेरील लोकांच्या सोबतीचं प्रतिक बनलं. लोक G-20 शी जोडलेलं आहेत. आपल्या देशात G-20 हा लोकांचा उत्सव बनला आहे. 60 शहरात 200 हून जास्त बैठका पार पडल्या, असंही मोदी म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी या परिषदेसाठी प्रस्तावना मांडली. G-20 परिषदेच्या प्रस्तावने दरम्यान मोदी यांनी मोठी घोषणा केली. आफ्रिकन युनियन आता या G-20 आंतरराष्ट्रीय समूहाचा कायमस्वरूपी सदस्य बनणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेमध्ये बोलताना सांगितलं.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.