योग्य वेळ येताच होणार ‘फैसला’; PoK बाबत हा आहे भारताचा प्लॅन, परराष्ट्रमंत्र्यांचं आलं बेधडक वक्तव्य..

Foreign Minister S. Jaishankar : कलम 370 हटविण्यात येईल, हे देशात कोणाला वाटलं होतं? असा सवाल करत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानने कब्जा केलेल्या काश्मीरच्या मुद्याला हात घातला. 1949 मध्ये पंडित नेहरु यांच्यामुळे पीओके पाकिस्तानाकडे गेल्याचे ते म्हणाले.

योग्य वेळ येताच होणार 'फैसला'; PoK बाबत हा आहे भारताचा प्लॅन, परराष्ट्रमंत्र्यांचं आलं बेधडक वक्तव्य..
Foreign Minister S Jaishankar
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 11:27 AM

टीव्ही9 भारतवर्षचा विशेष कार्यक्रम 5 एडिटर्समध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पीओकेच्या योजनेविषयी बेधडक मतं माडलं. योग्य वेळ येताच फैसला होईल, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला धडकी भरणार हे नक्की. पीओके परत येणार असे संपूर्ण देशाला वाटते. काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येईल, हे देशात कोणाला वाटलं होतं? असा सवाल करत त्यांनी पीओकेवर मोदी सरकारचे धोरण काय आहे, हे इशाऱ्यातूनच स्पष्ट केले. पीओके हे भारताचे आहे आणि आम्ही ते घेणारच असे त्यांनी ठणकावले.

नेहरुंमुळे गमावले PoK

जयशंकर म्हणाले की, 1949 मध्ये पंडित नेहरु यांच्यामुळे पीओके पाकिस्तानात गेले. नेहरुंच्या काळातील चुकीचा दोष पीएम मोदींना का? पीओकेची जमीन पाकिस्तानने चीनला दिली. कलम 370 हटविल्यानंतर काश्मीरचे भविष्य बदलले. पीओके भारताचे अविभाज्य भाग आहे. कोणाच्या तरी एका चुकीने ते देशापासून तुटले. पण योग्य वेळ येताच या प्रश्नाचा निकाल लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

थोडी कळ सोसा, वेळ येईल

पाकिस्तानने काश्मीरमध्ये वातावरण बिघडवले. एस. जयशंकर यांना याविषयी विचारण्यात आले. पीओके जरुर परत आणण्यात येईल. तुम्हाला कोणी थांबवले आहे का? 10 वर्षांपासून तुमचे सरकार आहे, मग पीओके भारतात का नाही आले, या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. प्रत्येक गोष्टी, कृतीसाठी एक वेळ येऊ द्यावी लागते. आपली पण तयारी असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटले ना

कोणत्याही पूर्व तयारीशिवाय मोठे पाऊल टाकल्यावर काय होते, हे सर्वांना माहिती आहे. त्यात मोठा धोका पण होऊ शकतो. जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटणार हे कोणाला वाटले होते का? पण किती सोप्या पद्धतीने सर्व गोष्टी झाल्या. त्यासाठी आम्ही अगोदर तयारी केली नाही का? विकासावर लक्ष केंद्रीत केले, एक मॉडल तयार केले. त्याचा लागलीच परिणाम दिसला.

6 महिन्यात PoK भारताचा भाग – CM योगी

तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका निवडणूक प्रचार सभेत पीओकेविषयी मोठे वक्तव्य केले. निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. त्याच्या पुढील 6 महिन्यात PoK भारताचा भाग असेल.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.