Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider | सैन्यातील लोकांनाच फ्रेंड रिक्वेस्ट का? सीमा हैदर हिने दिली ‘या’ 7 मोठ्या प्रश्नांची उत्तरे?

पाकिस्तानातील कराची येथून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एटीएसने सीमा आणि सचिनची चौकशी केली असून सीमाविरोधात अद्याप कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Seema Haider | सैन्यातील लोकांनाच फ्रेंड रिक्वेस्ट का? सीमा हैदर हिने दिली 'या' 7 मोठ्या प्रश्नांची उत्तरे?
SEEMA HAIDERImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 7:49 PM

नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : पाकिस्तानच्या सिंध भागातील घर विकून प्रेमासाठी सीमा हैदर भारतात आली. पण, सीमा हैदर आणि सचिन यांची प्रेमकहाणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पती गुलाम हैदर तिला मारहाण करत असे असा दावा तिने केला. सीमा हैदर आणि सचिन यांच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत. सीमाने 4 मुलांसह नेपाळमधून अवैधरित्या भारतीय हद्दीत प्रवेश केला. आता सीमा भारतात राहणार की तिला पाकिस्तानात पाठवायचे हे भारतीय कायद्यानुसार ठरवायचे आहे. मात्र, सीमा हिने पाकिस्तानात परतण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

सीमा आणि सचिन यांनी दोघांनी काठमांडू येथील पशुपती नाथ मंदिर परिसरात असलेल्या गुेश्वरी मंदिरात लग्न केल्याचा दावा केला, मात्र या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश मिळतो असा बोर्ड लावण्यात आला असल्याने सीमाने इथेही तिची ओळख लपवली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सीमा हैदर हिची एटीएसने चौकशी केली. तिने कोणत्याही परिस्थिती पुन्हा पाकिस्तानात जाणार नाही असे सांगितले. त्यांनतर तिला काही प्रमुख प्रश्न विचारण्यात आले. त्याची उत्तरे सीमाने दिली आहेत.

हे सुद्धा वाचा

1 – एटीएसने कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक संशय घेतला?

उत्तर : त्यांनी माझ्यावरच संशय घेतला. पण जे काही खरे होते ते सर्व मी त्यांना सांगितले. गावापासून कराचीपर्यंत आणि कराचीपासून इथपर्यंत सर्व काही सत्य सांगितले आहे. पुढे काय होईल ते कळेल.

2 – नेपाळमध्ये हॉटेल विनायकमधील रूम नंबर 204 मध्ये राहताना नाव का बदलले?

उत्तर : हॉटेलवाले खोटे बोलत आहेत. ना त्यांनी आमची नावे लिहायला लावली. स्वतःला वाचवण्यासाठी ते आता असे बोल्ट आहेत. ते नेपाळी लोक रोज सकाळी आमच्याकडून रुपये घेत असत.

3 – हॉटेलमध्ये नाव प्रीती असे लिहिले आहे का?

उत्तर : नाही, प्रीती हे नाव कधीच लिहिलेले नाही. ते माझे नाव होते आणि त्यांनाही ते माहीत होते. त्याने आमचे नावही लिहिले नाही. तसेच त्याने मला माझे नावही विचारले नाही. त्याने (सचिन) हॉटेलवाल्यांना सांगितले होते की, माझी पत्नीही राहायला येईल.

4 – हॉटेल विनायकच्या व्यवस्थापकाने सांगितले की तुम्हाला पब आणि बारमध्ये जायचे आहे?

उत्तर : कधीच नाही. मी पब आणि बारमध्ये सोडण्याबद्दल त्यांना कधीच बोलले नाही. माझ्या घरी मुले असतील तर मी हे कसे केले असते? आमच्याकडे फक्त 7 दिवस होते आणि मला परत जावे लागले. आम्ही तिथे हसत खेळत दिवस घालवले. आमचे ते दिवस खूप चांगले होते. मी त्याला भेटायला आले याचा त्याला (सचिन) धक्काच बसला. भारतात येईन असे कधी त्याच्या मनात नव्हते.

5 – पशुपती नाथ मंदिरात फक्त हिंदूच लग्न करतात, मग इथे लग्न कसे केले?

उत्तर : मी हिंदू आहे आणि मी गेल्या एक वर्षापासून हिंदू आहे. इथे येऊन मी हिंदू असल्याचे भासवत आहे, असे लोक म्हणत आहेत. पण, पाकिस्तानातही मी मनाने हिंदू होते. पण तिथे उघडपणे राहू शकले नाही. कारण मला हिंदू व्हायचे आहे असे मी तिथे सांगितले असते तर मी वाचले नसते.

6 – तुमचा भाऊ पाकिस्तानी सैन्यात काम करतो?

उत्तर : सचिन आणि माझी भेट झाली तेव्हा भाऊ मजूर होता हे मी अनेकदा सांगितले आहे. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्याला काम मिळत नव्हते. त्यानंतर माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो कर्तव्यावर होता. तोही सामान्य सैनिक. जेवढ्या संशयाने त्याच्याकडे पाहिले जात आहे तेवढी त्याची स्थिती नाही. माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही कारण मी विवाहित असून वेगळे राहत होतो.

7 – तुम्ही भारतातील लष्कराशी संबंधित लोकांना सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती?

उत्तर : अजिबात नाही. मी फेसबुक चालवत नाही. माझ्याकडे फोनही नाही. माझ्या आयडीत 5 मित्र होते. सचिन आणि सचिनचा जवळचा मित्र. आता माझ्या आयडीवर लाखो लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत. माझ्या नावाने अनेक लोकांचे आयडी बनवले आहेत. मी अजून कोणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही. माझा आयडी दुसऱ्याच्या फोनवर लॉग इन आहे त्यामुळे त्यांनी तो स्वीकारला असावा. मी कोणाला विनंती केली आहे हे कोणीही सिद्ध करू शकत नाही. मी फक्त इंस्टाग्राम वापरले जे फेसबुकशी जोडले आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.