Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाच्या घोर चुकीची शिक्षा तिला मिळाली, 94 टक्के मिळूनही ‘ती’ नापास झाली

अमेठी शहरातील श्री शिव प्रताप इंटर कॉलेजची विद्यार्थिनी भावना वर्मा हिला 94 टक्के गुण मिळाले. पण, प्रमाणपत्रावर ती नापास असल्याचे लिहिले होते. हा निकाल पाहून भावना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली.

कुणाच्या घोर चुकीची शिक्षा तिला मिळाली, 94 टक्के मिळूनही 'ती' नापास झाली
STUDENT BHAVNA Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 6:43 PM

अमेठी : उत्तर प्रदेश बोर्डाचा इयत्ता 10 वी आणि 12 वी चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. मात्र, या निकालामुळे एका बातमीची जोरदार चर्चा देशात सुरु आहे. 94 टक्के गुण मिळालेल्या एका हुशार विद्यार्थिनीला बोर्डाने नापास घोषित केले आहे. विद्यार्थिनीला सर्वच विषयात चांगले गुण मिळाले असताना ती नापास कशी झाली हा एकच प्रश्न चर्चिला जात आहे. त्या विद्यार्थिनीने आपले पेपर पुन्हा तपासण्याची मागणी केली असून याबाबत तिने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे.

अमेठी शहरातील श्री शिव प्रताप इंटर कॉलेजची विद्यार्थिनी भावना वर्मा हिला 94 टक्के गुण मिळाले. पण, प्रमाणपत्रावर ती नापास असल्याचे लिहिले होते. हा निकाल पाहून भावना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. भावनाने आणि तिच्या कुटुंबाने थेट मुख्यमंत्री यांना पत्र लिहले आहे. आपणच आता चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी तिने या पत्रातून केली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय झालं ?

भावना वर्मा हिला लेखी परीक्षेत 402 गुण मिळाले. तर, प्रॅक्टिकलमध्ये 30 ऐवजी 3 गुण देण्यात आले. त्यामुळे 180 ऐवजी केवळ 18 गुण जोडले गेल्याने ती नापास झाली. प्रॅक्टिकलचे तिचे 180 गुण जोडले असते तर तिचे एकूण गुण 564 म्हणजे 94 टक्के झाले असते.

चूक कुणाची ?

शाळेचे मुख्याध्यापक नवल किशोर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कार्यालयाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. भावना हिचे सर्वच विषयात गुण चांगले आले आहेत. पण, प्रॅक्टिकलच्या गुणांची त्यात भर पडली नाही. त्यामुले नापास असा निकाल आला. या निकालात दुरुस्ती करून तिला नवीन निकाल दिला जाणार आहे.

माध्यमिक शिक्षण संचालक महेंद्र देव यांनी टायपिंगमधील त्रुटीमुळे हा प्रकार घडला असावा. निकालाची दुरुस्ती करून तिच्या प्रात्यक्षिक गुणांच्या आधारे पुन्हा निकाल तयार केला जाईल, असे सांगितले.

भावनाचे थेट मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

भावना आणि तिच्या कटुंबीयांनी मुख्यमंत्री योगी याना पत्र लिहिले आहे. माझे थेअरी आणि प्रात्यक्षिक दोन्ही पेपर चांगले गेले. परंतु, माझ्या निकालात व्यावहारिक गुण जोडले गेले नाहीत. आम्हाला 30 नंबर मिळाले पण निकालात फक्त 3 नंबर जोडले गेले. त्यामुळे गुणांची संख्या वाढविण्यात यावी आणि याची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.