Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागरिकांनो पावसात सावधान, पोलला हात लावल्याने रेल्वे स्थानक परिसरात महिलेचा मृत्यू, कुठे घडली घटना

पावसाळ्यात खुल्या वीजेच्या तारा आणि डीपी पासून लांबच रहायला हवे, पावसाच्या सुरुवातीला खुल्या सोडलेल्या वीजेच्या तारांतून वीजप्रवाह वाहत असल्याने अनेकांचे अपघाती मृत्यू दरवर्षी होत असतात.

नागरिकांनो पावसात सावधान, पोलला हात लावल्याने रेल्वे स्थानक परिसरात महिलेचा मृत्यू, कुठे घडली घटना
water loggingImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 3:17 PM

दिल्ली : पावसाळा सुरु झाला असून साचलेल्या पाण्यामुळे अनेकांचा दरवर्षी बळी जात असतो. त्यामुळे पावसात सावधानता बाळगणे गरजेचे आहे. मॅनहोल ( Manhole ) उघडे असणे, किंवा नाला न दिसणे, झाडे किंवा बांधकाम पडल्याने अनेकांचे हकनाक जीव जात असतात. मुंबईतही ( Rainy Season Mumbai ) अनेकदा असे भयानक अपघात झाले आहेत. नवी दिल्ली रेल्वे ( New Delhi railway station ) स्थानक परिसरात एका महिलेचा इलेक्ट्रीक पोल हात लावल्याने इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाला आहे.

पावसाळ्यात खुल्या वीजेच्या तारा आणि डीपी पासून लांबच रहायला हवे, पावसाच्या सुरुवातीला खुल्या सोडलेल्या वीजेच्या तारांतून वीजप्रवाह वाहत असल्याने अनेकांचे अपघाती मृत्यू दरवर्षी होत असतात. रविवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानक परिसरात दिल्लीच्या प्रीत विहार परिसरात राहणारी साक्षी आहुजा ही महिला जात असताना तिने आधारासाठी इलेक्ट्रीक पोलला हात लावला आणि तिला वीजेचा जबर धक्का बसला. त्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह लेडी हार्दींग रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.

साचलेल्या पाण्यापासून बचाव करायला गेल्या

भोपाळ शताब्दी एक्सप्रेस पकडण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी साक्षी आहुजा आपल्या पती सोबत येत होत्या. त्यावेळी स्थानक परिसरात पाणी साचलेले होते. साचलेल्या पाण्यापासून आपला बचाव करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रीक पोलला हात लावला आणि त्यांचा घात झाला. त्यांना वीजेचा जबर धक्का बसला आणि जागीच त्यांचे प्राण गेल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

वडीलांनी केला प्रशासनावर आरोप

“आम्ही चंदीगडला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी येत होतो. मी गाडी पार्कींग परिसरात होतो. तेव्हा माझ्या मुलीचा असा अपघात झाल्याचे मला कळाले. हा तर प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे, “असा आरोप साक्षीचे वडील लोकेश कुमार चोपडा यांनी केला आहे. या प्रकरणात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 287 आणि 304 ( अ ) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलीसांची एफएसएल आणि रोहीणी टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपास सुरु आहे.

बालासोरमध्येही वीजेचा शॉक

अलिकडेच 2 जून रोजी ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यात कोरोमंडळ एक्सप्रेसच्या भीषण टक्करीत मृत्यू पावलेल्या चाळीस जणांच्या शरीरावर जखमेचा एकही निशान नसल्याने त्यांच्या डब्याला ओव्हरहेट वायरचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला असावा असा दावा बालासोर लोहमार्ग पोलिसांनी एफआयआरमध्ये केला आहे. या अपघातात आतापर्यंत 278 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.