आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी, मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ असण्याबरोबरच आचार्य एक उत्तम शिक्षकही होते. आपल्या आयुष्यात त्यांनी सर्व शिष्यांचे भविष्य उज्ज्वल केले चाणक्य नीती या त्यांच्या पुस्तकात त्यांनी खरा मित्र कसा ओळखावा यासंबंधी अनेक लक्षणे सांगितली आहेत. चला जाणून घेऊया खऱ्या मित्राची लक्षणे कोणती आहेत.
आचार्य चाणक्य यांच्या मते खरा मित्र तोच असतो जो कठीण प्रसंगातही तुमची साथ देतो. असा मित्र सोबत असल्याने माणूस कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडू शकतो. त्यामुळे जो व्यक्ती तुम्हाला कठीण प्रसंगात साथ देतो त्याला कधीही अंतर देऊ नका.
आचार्य चाणक्य यांच्या मते खरा मित्र तोच असतो जो आर्थिक संकटाच्या वेळी तुमची मदत करण्यास तयार असतो. जो मित्र तुमच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी मदत करू शकतो. तुमचा खरा मित्र तुम्हाला कोणत्याही संकाटात एकटं सोडणार नाही.
एखाद्याच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या परिवाराला सर्वात जास्त आधाराची गरज असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, खरा मित्र तोच असतो जो अशा वेळी तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि तुम्हाला साथ देतो.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार जो आजारपणातही तुमची साथ सोडत नाही. तुम्ही आजारी असताना तो तुम्हाला मदत करू शकतो. खरा मित्र माणसाचे जीवन यशस्वी करू शकतो. त्यामुळे आयुष्यात मित्र जोडताना या वरील सर्व गुण ज्या व्यक्ती कडे असतील त्याला तुमचा मित्र बनवा.