Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बगाड म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का ? पाहा सुंदर फोटो

बावधानच्या बगाडानिमित्त अतिशय उत्तम बैल बावधनमधे सांभाळली जातात. बागडाच्या तयारीसाठी व्यायाम म्ह्णून बैलांकडून शेतीची सर्व कामे करून घेतली जातात. भले मोठे लाकडी ओंढके ओढायला लावले जातात.

| Updated on: Mar 14, 2023 | 3:05 PM
महाराष्ट्रामध्ये बावधनचे बगाड हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. पण या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. कारण या खिल्लार बैलांशिवाय इतर कोणताही गोवंश इतक्या ताकतीचा नाही. बावधनमधील प्रत्येक घरामध्ये एक तरी धिप्पाड खिल्लार बैल सांभाळलेला दिसतो, याचे प्रमुख कारण म्हणजे बगाड आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी बावधनचा बगाड असते.

महाराष्ट्रामध्ये बावधनचे बगाड हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. पण या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. कारण या खिल्लार बैलांशिवाय इतर कोणताही गोवंश इतक्या ताकतीचा नाही. बावधनमधील प्रत्येक घरामध्ये एक तरी धिप्पाड खिल्लार बैल सांभाळलेला दिसतो, याचे प्रमुख कारण म्हणजे बगाड आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी बावधनचा बगाड असते.

1 / 5
बगाड म्हणजे काय?बावधन गावची यात्रा हि दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी येत असते. होळी पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होत असते. होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनचा बगाड्या कोण हे ठरवले जाते. बावधनचा बागड्या हा ज्या माणसाचा अगोदर केलेला नवस पूर्ण झाला आहे अशाच माणसावर तो कौल येत असतो. बगाडाच्या पाच दिवस अगोदर होळीचा कार्यक्रम असतो आणि होळीच्या अगोदर भैरवनाथ हळदीचा व लग्न सोहळ्याचा कार्यक्रम केला जातो. हळदीच्या कार्यक्रमा दिवशी देवाला हळद लावली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून जवळपास पाचशे वर्ष जुनी बगाड ही प्रथा चालत आलेली आहे, याचे पुरावे बावधन भैरवनाथाच्या मंदिरामधील सभामंडपात असलेल्या लाकडी खांबावर दरवर्षीप्रमाणे ठोकलेल्या लोखंडी नाल यावरून पाहायला मिळतात, दर वर्षी एक नाल ठोकला जातो. धुरवीला २ बैल, चावरी, सहा बैली, आठ बैली, १० बैली, बारा बैली, अशा प्रकारे १२ बैल (६ बैलजोड्या) या बगाडाला जुंपलेल्या असतात.

बगाड म्हणजे काय?बावधन गावची यात्रा हि दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी येत असते. होळी पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होत असते. होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनचा बगाड्या कोण हे ठरवले जाते. बावधनचा बागड्या हा ज्या माणसाचा अगोदर केलेला नवस पूर्ण झाला आहे अशाच माणसावर तो कौल येत असतो. बगाडाच्या पाच दिवस अगोदर होळीचा कार्यक्रम असतो आणि होळीच्या अगोदर भैरवनाथ हळदीचा व लग्न सोहळ्याचा कार्यक्रम केला जातो. हळदीच्या कार्यक्रमा दिवशी देवाला हळद लावली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून जवळपास पाचशे वर्ष जुनी बगाड ही प्रथा चालत आलेली आहे, याचे पुरावे बावधन भैरवनाथाच्या मंदिरामधील सभामंडपात असलेल्या लाकडी खांबावर दरवर्षीप्रमाणे ठोकलेल्या लोखंडी नाल यावरून पाहायला मिळतात, दर वर्षी एक नाल ठोकला जातो. धुरवीला २ बैल, चावरी, सहा बैली, आठ बैली, १० बैली, बारा बैली, अशा प्रकारे १२ बैल (६ बैलजोड्या) या बगाडाला जुंपलेल्या असतात.

2 / 5
बगाड कसे बनवले जाते?  बगाडाचे वजन जवळपास ३ ते ४ टन इतके असते. बागडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती साठी, साठी वरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड, शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. बगाडाच्या आदल्या दिवशी छबीना असतो, त्या दिवशी बगाडाचा रथ तयार केला जातो. बावधन गावामधील सर्व बलुतेदार सुतार समाज मिळून बगाड बनवत असतात. गावातील सर्व सुतार आणि प्रमुख मंडळी एकत्र येऊन हे काम पूर्ण करतात. अंदाजे २० ते २५ जण हा बगाडाचा गाडा तयार करतात. बागडाची चाके ही दगडी असतात. त्यानंतर कणा, कणा हा साडे नऊ फुटाचा असतो. कण्यावरती बूट बसवलेले असते. दरवर्षी बागडाला लागणारा कणा हा देशी बाभळीच्या लाकडापासून नवीन केला जातो. त्यानंतर दांड्या या बुटामध्ये बसलेल्या असतात. त्यानंतर साठा बसवला जातो. साट्या बसवल्यानंतर त्यावर वाघ बसवला जातो. वाघाचे वजन अंदाजे १ ते दीड टन एवढे असते. कण्यामध्ये दोन्ही बाजूला दगडी चाके बसवली जातात. तसेच ४५ ते ५० फूट लांबीचे गुंफलेले शीड देखील बागडाच्या खांबावर बसवलेले असते. जु, खांब ,जुंपण्या, पिळकावण्या हे सुतार मंडळी करत असतात. बगाडाचा गाडा तयार करायला ८ ते १० दिवस अगोदर काम चालू केले जाते आणि रात्रंदिवस हे काम करून गाडा पूर्ण केला जातो. बगाडाचा गाडा हा संपूर्ण पणे बाभळीच्या लाकडापासून तयार केला जातो. लोखंडाचा कोणताच भाग वापरला जात नाही. आळदांडी तेव्हडी फक्त चंदनाची असते. बागडाला वापरले जाणारे लाकूड हे ओले असल्या कारणाने ते जास्त वजनदार असते. बगाड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील थोरल्या विहिरीमध्ये ठेवले जाते. कि जेणेकरून ते पुढील २-३ वर्ष वापरले जाते.

बगाड कसे बनवले जाते? बगाडाचे वजन जवळपास ३ ते ४ टन इतके असते. बागडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती साठी, साठी वरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड, शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. बगाडाच्या आदल्या दिवशी छबीना असतो, त्या दिवशी बगाडाचा रथ तयार केला जातो. बावधन गावामधील सर्व बलुतेदार सुतार समाज मिळून बगाड बनवत असतात. गावातील सर्व सुतार आणि प्रमुख मंडळी एकत्र येऊन हे काम पूर्ण करतात. अंदाजे २० ते २५ जण हा बगाडाचा गाडा तयार करतात. बागडाची चाके ही दगडी असतात. त्यानंतर कणा, कणा हा साडे नऊ फुटाचा असतो. कण्यावरती बूट बसवलेले असते. दरवर्षी बागडाला लागणारा कणा हा देशी बाभळीच्या लाकडापासून नवीन केला जातो. त्यानंतर दांड्या या बुटामध्ये बसलेल्या असतात. त्यानंतर साठा बसवला जातो. साट्या बसवल्यानंतर त्यावर वाघ बसवला जातो. वाघाचे वजन अंदाजे १ ते दीड टन एवढे असते. कण्यामध्ये दोन्ही बाजूला दगडी चाके बसवली जातात. तसेच ४५ ते ५० फूट लांबीचे गुंफलेले शीड देखील बागडाच्या खांबावर बसवलेले असते. जु, खांब ,जुंपण्या, पिळकावण्या हे सुतार मंडळी करत असतात. बगाडाचा गाडा तयार करायला ८ ते १० दिवस अगोदर काम चालू केले जाते आणि रात्रंदिवस हे काम करून गाडा पूर्ण केला जातो. बगाडाचा गाडा हा संपूर्ण पणे बाभळीच्या लाकडापासून तयार केला जातो. लोखंडाचा कोणताच भाग वापरला जात नाही. आळदांडी तेव्हडी फक्त चंदनाची असते. बागडाला वापरले जाणारे लाकूड हे ओले असल्या कारणाने ते जास्त वजनदार असते. बगाड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील थोरल्या विहिरीमध्ये ठेवले जाते. कि जेणेकरून ते पुढील २-३ वर्ष वापरले जाते.

3 / 5
 बगाड्याची निवड कशी करतात ? बगाड्याची निवड ही होळी पौर्णिमेला केली जाते. बावधानच्या श्री भैरवनाथ मंदिरामधे कौल लावला जातो आणि होळी पौर्णिमेनिमित्त बगाड कुणावर आलाय याचा कौल नाथांचे वंशपरंपरागत प्रमुख पुजारी व पंच मंडळी घेत असतात. नवसाचा कौल लावायला जवळपास १०० पेक्षाही अधिक नवस केलेली मंडळी हजर असतात. पण यातून फक्त एका व्यक्तीची देवाला कौल लावून  बगाड्यासाठी निवड केली जाते.

बगाड्याची निवड कशी करतात ? बगाड्याची निवड ही होळी पौर्णिमेला केली जाते. बावधानच्या श्री भैरवनाथ मंदिरामधे कौल लावला जातो आणि होळी पौर्णिमेनिमित्त बगाड कुणावर आलाय याचा कौल नाथांचे वंशपरंपरागत प्रमुख पुजारी व पंच मंडळी घेत असतात. नवसाचा कौल लावायला जवळपास १०० पेक्षाही अधिक नवस केलेली मंडळी हजर असतात. पण यातून फक्त एका व्यक्तीची देवाला कौल लावून बगाड्यासाठी निवड केली जाते.

4 / 5
बैलांचा व्यायाम काय असते ?  बावधानच्या बगाडानिमित्त अतिशय उत्तम बैल बावधनमधे सांभाळली जातात. बागडाच्या तयारीसाठी व्यायाम म्ह्णून बैलांकडून शेतीची सर्व कामे करून घेतली जातात. भले मोठे लाकडी ओंढके ओढायला लावले जातात. नांगराला जुंपून जास्तीत जास्त मेहनत त्यांच्या कडून करून घेतली जाते. पळवणे आणि चालवणे हा व्यायाम सर्रास त्यांच्याकडून करून घेतला जातो.

बैलांचा व्यायाम काय असते ? बावधानच्या बगाडानिमित्त अतिशय उत्तम बैल बावधनमधे सांभाळली जातात. बागडाच्या तयारीसाठी व्यायाम म्ह्णून बैलांकडून शेतीची सर्व कामे करून घेतली जातात. भले मोठे लाकडी ओंढके ओढायला लावले जातात. नांगराला जुंपून जास्तीत जास्त मेहनत त्यांच्या कडून करून घेतली जाते. पळवणे आणि चालवणे हा व्यायाम सर्रास त्यांच्याकडून करून घेतला जातो.

5 / 5
Follow us
कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?
कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?.
तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, 5 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू
तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, 5 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू.
'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत
'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत.
तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी
तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी.
धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?
धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?.
राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले..
राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले...
पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, 5 ठार
पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, 5 ठार.
सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले...
सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले....
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले