संत्री - संत्री खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे कारण म्हणजे ते स्वादिष्ट असण्यासोबतच सर्व आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. हिवाळ्याच्या काळात आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या मोसमात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या संत्रीचे सेवन केले पाहिजे.
जाणून घ्या सिताफळाचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे
डाळिंब - हिवाळ्यामध्ये डाळिंबाचे सेवन करणे फायदेशीर आहे. डाळिंब खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे या हंगामात दररोज किमान एकतरी डाळिंब खाल्ले पाहिजे.
अंजीर - अंजीर पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे. जो शरीराला रक्तदाब राखण्यासाठी आवश्यक असलेले खनिज आहे. गरम आणि वाफेदार, तेलकट पदार्थ हिवाळ्यात जास्त खाल्ले जातात. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटॅशियम समृध्द आहार घेणे आवश्यक आहे.
सफरचंद - सफरचंद हिवाळ्यात खाणे आवश्यक आहे. कारण हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो. अशा स्थितीत बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. सफरचंदांमध्ये पेक्टिनचे प्रमाण जास्त असते. ते बद्धकोष्ठता आणि अतिसार दोन्हीपासून मुक्त होण्यासाठी मदत करते.