जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तरीही गोड खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. कलिंगड खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही आणि शरीर हायड्रेट राहते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडचा आहारात समावेश करा.
तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल, मात्र आंब्याच्या पानांचे सेवन करूनही आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेऊ शकतो. आंब्याची पाने उकळवा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी उपाशी पोटी प्या. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीचे टेन्शन कमी होईल.
उन्हाळ्यात चहा पिणे चांगले मानले जात नसले तरी साखरेच्या रुग्णांनी हर्बल चहाचे सेवन करावे. हे रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.
निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे तणाव निर्माण होतो आणि अशा स्थितीत साखरेची पातळी वाढू शकते. तज्ञांच्या मते, आपण सर्वांनी किमान 8 तासांची झोप घेतली पाहिजे.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, योगा करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. योगामुळे आतून निरोगी राहण्यासोबतच हे आपल्याला दिवसभर सक्रिय ठेवते. योगासने केल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते, असे संशोधनातून समोर आले आहे. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)