महिन्याभरापूर्वी त्याने हार्दिकवर खूप टीका केलेली. हार्दिकला बरच काही बोलला होता. आता टीम इंडियाने दमदार प्रदर्शनाच्या बळावर T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर त्याचे सूर बदलले आहेत.
फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 रन्सनी हरवलं. दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू इमोशनल झाला. त्याचे डोळे भरुन आले. कॉमेंट्री करता करताच त्याला रडू कोसळलं.
मागचे दहा दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. हे जे अश्रू आहेत, ते दु:खाचे नाहीत. हे आनंदाश्रू आहेत. टीम इंडिया तुमचे खूप-खूप आभार असं हा क्रिकेटपटू म्हणाला.
मी बुमराह, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचा आभारी आहे, असं इरफान पठाण म्हणाला. मी सूर्यकुमार यादवचा कॅच कधीच विसरणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासावेळी सुद्धा ही कॅच विसरणार नाही असं इरफान म्हणाला.
काही महिन्यापूर्वी इरफान पठाणने हार्दिक पांड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. बीसीसीआयने हार्दिकला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देण्याचाही विरोध केला होता. हार्दिकला T20 वर्ल्ड कप टीममध्ये निवडलं, त्यावेळी सुद्धा इरफानने टीका केलेली. रिंकू आणि हार्दिकसाठी वेगवेगळ निकष का? असा त्याचा प्रश्न होता.