मोहम्मद सिराज याने श्रीलंका विरुद्ध 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 51 धावांचे आव्हान मिळाले. टीम इंडियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं. टीम इंडियाने यासह आशिया कप ट्रॉफी 10 विकेट्सने जिंकला.
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आशिया कप उंचावला. या स्पर्धेत टीम इंडियाने फिल्डिंग बॅटिंग आणि बॉलिंग या तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली. टीम इंडियाने या स्पर्धेत सांघिक कामगिरी केली.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडिया कॅप्टन रोहित शर्मा याच्या हातात आशिया कप ट्रॉफी दिली. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा आणि एकूण आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली.
आशिया कप ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियावर पैशांचा पाऊस पाडण्यात आलाय. टीम इंडियाला आशिया कप जिंकल्यानंतर बक्षिस म्हणून जवळपास 1 कोटी 24 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात आलय.
तसेच या स्पर्धेत गतविजेता श्रीलंका टीम यंदा उपविजेता ठरली. या श्रीलंका टीमलाही 63 लाख रुपयांचं बक्षिस देण्यात आलंय.