विराट कोहलीने 2022 च्या सुरुवातीला टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कर्णधारपद सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये एकही ट्रॉफी जिंकली नाही. यानंतर टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली.
टी-20 विश्वचषक, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयचे नेतृत्व बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार रोहित शर्माने टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. आशिया कपमध्येही पराभवाचं तोंड पाहावं. त्यामुळे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियासाठी विजय अपरिहार्य आहे.
रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतरही भारतीय संघाने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे सर्व अपेक्षा आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आहेत. यानंतर एकदिवसीय विश्वचषकही येणार आहे.
टी-20 विश्वचषकात टीम इंडियावर नामुष्की ओढावली होती. त्यामुळे टीम इंडियाचे लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आणि एकदिवसीय वर्ल्डकपकडे लागले आहे. विशेषत: संघाला चॅम्पियन बनवून बीसीसीआयचे नेतृत्व बदल योग्य असल्याचे सिद्ध करण्याची गरज रोहित शर्माला आहे.