IND vs BAN : आर. अश्विन क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? स्वत: खुलासा करत म्हणाला…

| Updated on: Sep 15, 2024 | 4:48 PM

Ravichandran Ashwin Retirement : टीम इंडियाचा दिग्गज स्पिनर असलेला आर. अश्विन याने आपल्या निवृत्तीबाबत मोठे विधान केले आहे. अश्विनने निवृत्ती कधी घेणार हे सांगितलं आहे.

1 / 5
टीम इंडियाचे अनेक मोठे खेळाडू आता टीमबाहेर आहेत. एकेकाळी टीमचे हुकमी एक्के असणारे आता टीममध्ये परत एकदा स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं दिसत आहेत. मात्र काही खेळाडूंनी आपले स्थान चांगले प्रदर्शन करत भक्क केले आहे. यामध्ये आर. अश्विन याचा समावेश आहे.

टीम इंडियाचे अनेक मोठे खेळाडू आता टीमबाहेर आहेत. एकेकाळी टीमचे हुकमी एक्के असणारे आता टीममध्ये परत एकदा स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं दिसत आहेत. मात्र काही खेळाडूंनी आपले स्थान चांगले प्रदर्शन करत भक्क केले आहे. यामध्ये आर. अश्विन याचा समावेश आहे.

2 / 5
आता भारत आणि बांगलादेशविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड झाली आहे. अश्विनच्या निवृत्तीच्या चर्चा होताना दिसत आहेत. याबाबत अश्विनने एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलंय.

आता भारत आणि बांगलादेशविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड झाली आहे. अश्विनच्या निवृत्तीच्या चर्चा होताना दिसत आहेत. याबाबत अश्विनने एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलंय.

3 / 5
मी स्वत:साठी कोणतेही टार्गेट ठेवलेले नाही. मी त्यांचा विक्रम मोडावा, अशी अनिल कुंबळेंची इच्छा आहे. मला टार्गेट ठरवून खेळावरील माझे प्रेम कमी करायचे नसल्याचंही अश्विन म्हणाला.

मी स्वत:साठी कोणतेही टार्गेट ठेवलेले नाही. मी त्यांचा विक्रम मोडावा, अशी अनिल कुंबळेंची इच्छा आहे. मला टार्गेट ठरवून खेळावरील माझे प्रेम कमी करायचे नसल्याचंही अश्विन म्हणाला.

4 / 5
माझ्या मनात असे काहीही नाही. मी या टप्प्यावर फक्त एक दिवस विचार करत आहे. कारण जेव्हा तुम्ही मोठे होतात तेव्हा तुम्हाला दररोज जास्त मेहनत करावी लागते.गेल्या 3-4 वर्षात मी खूप मेहनत केली आहे. मी अजून निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही, पण ज्या दिवशी मला वाटेल की मला सुधारायचे नाही, तेव्हा मी निवृत्त होईन, असं आर अश्विन याने म्हटलं आहे.

माझ्या मनात असे काहीही नाही. मी या टप्प्यावर फक्त एक दिवस विचार करत आहे. कारण जेव्हा तुम्ही मोठे होतात तेव्हा तुम्हाला दररोज जास्त मेहनत करावी लागते.गेल्या 3-4 वर्षात मी खूप मेहनत केली आहे. मी अजून निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही, पण ज्या दिवशी मला वाटेल की मला सुधारायचे नाही, तेव्हा मी निवृत्त होईन, असं आर अश्विन याने म्हटलं आहे.

5 / 5
दरम्यान, अश्विन हा 100 कसोटी सामन्यात 516 बळी घेणारा भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे दिग्गज अनिल कुंबळे आहे, ज्याने 619 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, अश्विन हा 100 कसोटी सामन्यात 516 बळी घेणारा भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे दिग्गज अनिल कुंबळे आहे, ज्याने 619 विकेट्स घेतल्या आहेत.