Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिवेशनाआधी १० आमदार फुटणार?; बच्चू कडू यांच्या दाव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले?

शहाजीबापू पाटील म्हणाले, आमदार बच्चू कडू हे जबाबदारीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत तर फुटूही शकतात.

अधिवेशनाआधी १० आमदार फुटणार?; बच्चू कडू यांच्या दाव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले?
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 11:37 PM

मुंबई : येत्या अधिवेशनाआधी विरोधी पक्षांचे 10 ते 12 आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय. बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यावर संजय राऊत यांनी चिमटा काढलाय. बच्चू कडूंचा दावा नेमका काय आहे?. जे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत, त्या बच्चू कडूंनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय. इतर पक्षातल्या 10 ते 12 आमदारांचा भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. इतर पक्षातले काही आमदार आहेत. त्यांचाही पक्षप्रवेश कदाचित होऊ शकतो. तारखेवर तारीख येत आहे. त्याचं कारण एक तर कोर्ट आणि दुसरं कारण पक्षप्रवेश…10 ते 15 आमदार बऱ्य़ापैकी राहिलेल्या पक्षामधले फुटतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

15 आमदार अधिवेशनाआधी फुटणार

बच्चू कडूंनी आमदार फुटणार असल्याचा दावा केला असला तरी कुठल्या पक्षाचे आमदार फुटणार हे मात्र गुपीत ठेवलंय. आत्ताच याबाबत गौप्यस्फोट करु इच्छित नसल्याचं त्यांनी सांगितलंय. कुठल्या पक्षातले फुटतील ते मला स्पष्ट सांगता येणार नाही. हे गोपनीय आहे. तुम्हाला मोघमपणे सांगू शकतो. हेच फुटणार, याच पक्षाचे फुटणार हे नाही सांगू शकत. पण मला वाटतं 10 ते 15 आमदार अधिवेशनाआधी फुटणार, असंही बच्चू कडू म्हणाले.

शहाजीबापू पाटील यांनी दिला दुजोरा

यावर संजय राऊत म्हणाले, स्वत: बच्चू कडू पण करतायत का? बघा कोण काय बोलतंय. त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. बहुतेक मला माहिती आहे. भाजपचे काही आमदार प्रवेश करतायत. बच्चू कडू यांची माहिती बरोबर आहे. बच्चू कडूंच्या दाव्याला शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनीही दुजोरा दिलाय.

शहाजीबापू पाटील म्हणाले, आमदार बच्चू कडू हे जबाबदारीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत तर फुटूही शकतात.

बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाच्या दाव्याला सहा महिन्यांचा कालावधी

जयंत पाटील म्हणाले, मला काहीही कल्पना नाही. बच्चू कडू काय म्हणाले त्याबद्दल मला कल्पना नाही. बच्चू कडूंनी आपल्याला मंत्रिपद मिळणार असल्याचा दावा करुन 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालाय. त्यांचं हे स्वप्न अद्याप तरी पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं त्यांनी केलेल्या नव्या दाव्यावर संजय राऊत यांनी चांगलाच चिमटा घेतलाय.

मुंब्रा अत्याचार आणि हत्या प्रकरण; पीडितेच्या भावाचे गंभीर आरोप
मुंब्रा अत्याचार आणि हत्या प्रकरण; पीडितेच्या भावाचे गंभीर आरोप.
सरपंच हत्येला 4 महिने उलटले, धनंजय देशमुखांच्या बीड पोलिसांना एकच सवाल
सरपंच हत्येला 4 महिने उलटले, धनंजय देशमुखांच्या बीड पोलिसांना एकच सवाल.
पर्यटनाची राजधानी असुरक्षित, अजिंठा-वेरूळला जाताय? जरा जपूनच, कराण...
पर्यटनाची राजधानी असुरक्षित, अजिंठा-वेरूळला जाताय? जरा जपूनच, कराण....
सुप्रिया सुळे तीन तासांपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून
सुप्रिया सुळे तीन तासांपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून.
'ए जा रे भैय्या.. अरे XXX', 'त्या' कॉलवर संदीप देशपांडे थेट म्हणाले...
'ए जा रे भैय्या.. अरे XXX', 'त्या' कॉलवर संदीप देशपांडे थेट म्हणाले....
.. पण त्यांनी प्रथा, परंपरा धुळीस मिळवली, रोहित पवारांचं ट्विट
.. पण त्यांनी प्रथा, परंपरा धुळीस मिळवली, रोहित पवारांचं ट्विट.
26\11 चा मास्टमाईंड उद्या भारतात, तहव्वूर राणाला NIA ची टीम घेऊन येणार
26\11 चा मास्टमाईंड उद्या भारतात, तहव्वूर राणाला NIA ची टीम घेऊन येणार.
संतोष देशमुख यांच्या हत्येला 4 महीने पूर्ण; न्यायची लढाई सुरूच
संतोष देशमुख यांच्या हत्येला 4 महीने पूर्ण; न्यायची लढाई सुरूच.
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर.
विष्णुचा अवतार आहेत, तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं; राऊतांची टीका
विष्णुचा अवतार आहेत, तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं; राऊतांची टीका.