Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेदांता – फॉक्सकॉननंतर आदित्य ठाकरेंचा सरकारवर आणखी एक मोठा आरोप

वर्सोवा बांद्रा सी लिंकचं काम बंद पाडलं गेलं, आता या कामासाठी जे इंजीनिअर्स लागणार आहेत, त्यांच्यासाठी मुलाखतीची जाहिरात ही चेन्नईत का दिली जात आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

वेदांता - फॉक्सकॉननंतर आदित्य ठाकरेंचा सरकारवर आणखी एक मोठा आरोप
आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 2:54 PM

मुंबई : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज राज्यातील शिंदे सरकारवर प्रकल्पांबाबत घणाघाती आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत आरोप करताना त्यांनी वेदांता-फॉक्सकॉनमुळे राज्याचं किती नुकसान झालं याची आठवण करुन दिली. बल्कड्रग (bulk drug) पार्कही राज्याबाहेर गेल्याने किती रोजगार गेले याची देखील आठवण करुन दिली, पण आदित्य ठाकरे यावरच थांबले नाहीत. आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा ब्रांद्रा सी लिंकविषयी सर्वात मोठा आरोप राज्य सरकारवर (State Govt) केला आहे. राज्याच्या बाहेर प्रकल्प जाणे या विषय वेगळा,पण राज्यात जे प्रकल्प राबवले जात आहेत, त्याच्या मुलाखतींची जाहिरात ही इतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दिली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

वर्सोवा बांद्रा सी लिंकचं काम बंद पाडलं गेलं, आता या कामासाठी जे इंजीनिअर्स लागणार आहेत, त्यांच्यासाठी मुलाखतीची जाहिरात ही चेन्नईत का दिली जात आहे.

महाराष्ट्राच्या तरुण-तरुणींकडे देखील हे स्कील असताना ही जाहिरात परराज्यात का. आमच्या मुलांचं यात नुकसान होतंय, ही जाहिरात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर किंवा अमरावतीत दिली तर आमचे तरुण मुलाखतीला पोहोचतील.

हे सुद्धा वाचा

पण या तरुण-तरुणींना यापासून का दूर ठेवलं जात आहे, जाहिराती या चेन्नईत का दिल्या जात आहेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे, तसेच मुख्यमंत्री महोदयांनी यावर उत्तर द्यावं अशी मागणी केली आहे.

जे स्कील मुंबई-महाराष्ट्रात उपलब्ध नसेल, तर इतर राज्यातून काय परदेशातून का लोक मागवले तरी आक्षेप नाही. पण एका ठराविक शहरातच ही जाहिरात का याचं उत्तर सरकारने द्यावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतले काही महत्त्वाचे मुद्दे

वेदांता – फॉक्सकॉनवरुन राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही, बल्कड्रग पार्कही राज्याचा बाहेर गेला, त्यावरही उत्तर नाही.

मुख्यमंत्री दिल्लीत स्वत:साठी गेले की महाराष्ट्रासाठी,शिंदेची दिल्लीवारी आठवी आहे आणि २ वाऱ्या लपून छपूनसह १२ वी वारी.

राज्यातील किती प्रकल्पांना खोके सरकारने स्थिगिती दिली? हे पाहणे हा देखील एक सवाल आहे. वर्सोवा ब्रांदा सी लिंक हे देखील काम बंद पाडले.

वर्सोवा ब्रांदा सी लिंक हे काम मुंबईत आणि मुलाखती चेन्नईत होत आहेत. वेदांताच्या अध्यक्षांना महाराष्ट्राला काहीतरी देऊ हे ट्ववीट करण्यासाठी दवाब आणला – वेदांता – फॉक्सकॉनवरुन राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही.

...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.