Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोपेंनी जालन्यासाठी मनमानी केल्याचा भातखळकरांचा आरोप, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री की जालन्याचे ?

अतुल भातखळकर यांनी जालना जिल्ह्याला जास्त लसी मिळाल्याच्या मुद्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला. Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope

टोपेंनी जालन्यासाठी मनमानी केल्याचा भातखळकरांचा आरोप,  महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री की जालन्याचे ?
अतुल भातखळकर, राजेश टोपे
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 12:58 PM

मुंबई: महाराष्ट्रात एकीकडे कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होतेय. दुसरीकडे लसीकरणाच्या मुद्यावरुन राजकारण देखील तापलेलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जालना जिल्ह्याला जास्त लसी मिळाल्याच्या मुद्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे अतुल भातखळकर यांनी यावेळी राजेश टोपे जालन्याचे आरोग्यमंत्री आहेत की महाराष्ट्राचे?,असा प्रश्न उपस्थित केला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope on extra corona vaccine allocation Jalna)

राजेश टोपेंवर निशाणा

केंद्राकडून मिळालेल्या 26.77 लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?, अशा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारवर मनमानीचा आरोप

अतुल भातखळकर यांनी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधताना महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना लसींचं मनमानी पद्धतीनं वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार डोस ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे? आहात असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

महाराष्ट्राला 26.77 लाख लसी

केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 26.77 लाख लसींचं साठा दिला आहे. या लसींचं मनमानी पद्धतीनं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावरुनही राज्य सरकारवर निशाणा

ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांना मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळेच हा विषय कोर्टात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई महापालिका कुणाची?, जेपी नड्डा येण्याआधीच भाजप-शिवसेनेत रंगलं वाकयुद्ध

भाजपला ‘ओबीसीं’चा नारा देण्याची वेळ का आलीय?; वाचा राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

(BJP MLA Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope on extra corona vaccine allocation Jalna)

'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.