Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुखांना एक आणि नवाब मलिकांना वेगळा न्याय, लाड करण्याचं कारण काय? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा, बारावी परीक्षांच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

अनिल देशमुखांना एक आणि नवाब मलिकांना वेगळा न्याय, लाड करण्याचं कारण काय? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल
राधाकृष्ण विखे पाटील
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 5:12 PM

अहमदगर : भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा, बारावी परीक्षांच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. याशिवाच विखे पाटील यांनी काँग्रेस आणि संजय राऊत यांच्यावरील निशाणा साधलाय. नवाब मलिक यांचं एवढ्या गंभीर प्रकारणात नाव आल्यावर बडतर्फ नव्हे तर हकालपट्टी केली पाहिजे होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अनिल देशमुखांवर लगेच कारवाई केली जाते आणि यांना पाठिशी घालण्याचे कारण काय ?, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सरकार मध्ये जनाची नाही पण मनाची लाज असेल तर त्यांनी कारवाई केली पाहिजे, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. काँग्रेस मंत्री भ्रष्टाचारात अडकल्यानं ते सरकारमधून बाहेर पडत नाहीत, असं विखे पाटील म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

त्या टेम्पो जळीत प्रकरणाची चौकशी व्हावी

बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणारा टेम्पो जळाला की जाळला चौकशी करायला पाहिजे. सरकार अगोदरच भरती प्रक्रियेत अडचणीत आले आहे. एकही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडत नाही. कोव्हिड काळात शिक्षण विभागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच प्रश्नपत्रिका असलेल्या टेम्पोला आग लागलीय. सदर जळीत प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

काँग्रेसचे अनेक मंत्री भ्रष्टाचारात अडकले :

काँग्रेसने स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी सरकार मधून बाहेर पडलं पाहिजे. काँग्रेसचे अनेक मंत्री भ्रष्टाचारात अडकलेले असल्यानं ते बाहेर पडत नाहीत. मंत्री राहिलो तर संरक्षण मिळेल याच मूळे ते सत्तेत. काँग्रेसच्या भविष्याची कोणालाच चिंता राहिली नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

पाहा व्हिडीओ

संजय राऊत आधार नसलेली बेताल वक्तव्य करतात

आधार नसलेली बेताल वक्तव्य करण्याच काम संजय राऊत करत आहेत. सततच्या चौकशीमुळे राऊत अडचणीत आले आहेत. उद्या आपल्यावर कारवाई होईल या भीतीने संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत आहेत.

इतर बातम्या:

Prakash Shendage | ‘ओबीसींचा अहवाल तज्ज्ञांकडून करा, सर्वोच्च न्यायालयात हरल्यास राज्य सरकार जबाबदार’

कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची लढाई हाच शिवसेनेचा कार्यक्रम; आशिष शेलारांचा हल्लाबोल

BJP Radhakrishna Vikhe Patil slam MVA Government over Nawab Malik Resignation

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.