Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्ग आल्याने काय फायदा होणार?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडून सांगितलं…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची Exclusive मुलाखत...

समृद्धी महामार्ग आल्याने काय फायदा होणार?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडून सांगितलं...
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 10:06 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्या लोकार्पण होणार आहे. त्याआधी समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) काय फायदा होणार आहे? या महामार्गाचा वाहतुकीसाठी कसा फायदा होणार आहे? टोल किती द्यावा लागणार?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष मुलाखत (Cm Eknath Shinde Exclusive Interview) tv9 मराठीवर…

समृद्धी महामार्ग का?

ज्या देशातील रस्ते चांगले असतात त्या देशाची प्रगती अधिक वेगाने होते. अमेरिकेचंही तसंच आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावेल, असा विश्वास आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुलाखतीत बोलताना सांगितलं.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली. तेव्हा मी मंत्री होतो. तेव्हा या महामार्गाचं काम सुरू झालं. आता मी मुख्यमंत्री असताना त्याचं लोकर्पण होतंय. लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतंय आणि या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंय, याचा मला आनंद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

समृद्धी महामार्ग सत्यात आणण्याचा मार्ग खडतर होता. पण त्याचं काम उत्तम झालंय. याचा मला आनंद आहे, असंही शिंदे म्हणालेत.

जमीनी द्यायला शेतकऱ्यांचा विरोध होता. त्यांना जमीनी द्यायला तयार करावं लागत होतं. काही ठिकाणी मुद्दाम विरोध करायला भाग पाडलं जात होतं. तेव्हा मी स्वत: बुलढाण्याला गेलो होतो. त्यांचा समज मी दूर केला. त्यांना फायदा दाखवून दिला. त्यांच्या जमीनीचा योग्य मोबदला देण्याचं वचन दिलं. लोकांना विश्वास नव्हता की त्यांना योग्य दाम मिळेल की नाही याचा पण मी त्यांना खात्री दिली. कागदावर सही करून दिली. तेव्हा हे लोक आपली जमीन द्यायला तयार झाले, अशी आठवण शिंदेंनी सांगितली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपूर्ण मुलाखतीची लिंक

बुलढाण्याच्या लोकांचं मन परिवर्तन केल्यानंतर आम्ही तिथून निघालो. पायलटकडून विमान ढगात गेलं. तेव्हाचा तो प्रवास अतिशय अडचणीचा होता. तो थरारक प्रवास अजही आठवतो, असं शिंदेंनी सांगितलं.

धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?.
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ...
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ....
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला.
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.