Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, आता काँग्रेसला खिंडार पडणार; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

आम्ही तिसरी आघाडी म्हणून कार्य करत नाही. आम्ही इंडियाच्या बाजूनेही नाही आणि एनडीएच्या बाजूने पण नाही. पण लोकांना नवीन पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे.

शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, आता काँग्रेसला खिंडार पडणार; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ
k. chandrashekar raoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 7:05 AM

कोल्हापूर | 2 ऑगस्ट 2023 : राज्यात शिवसेना फुटली. त्यापाठोपाठ वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसला लवकरच खिंडार पडणार असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच काँग्रेसमधील कोणता नेता बंड करणार? यावरही जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कोल्हापुरात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शरद पवार आम्हाला भारतीय जनता पार्टीची बी टीम समजत होते. आज त्यांच्या पक्षाची काय स्थिती झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, आता काँग्रे ही फुटण्याच्या मार्गावर आहे, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

एक लाख शेतकरी आत्महत्या करणार

आम्ही महाराष्ट्रातून सुरुवात जरी केली असली तरीही शेतकरी, दलित आणि तरुणांसाठी आमचं काम असणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हे सरकार उदासीन आहे. आम्ही तेलंगणा पॅटर्न राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र या सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही दया नाही. महाराष्ट्रातीलच एका अधिकाऱ्याने एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याचा अहवाल दिला, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात 14 लाख पदाधिकारी

एनडीए किंवा इंडिया आघाडीत का गेला नाही? यावरही चंद्रशेखर राव यांनी भाष्य केलं. आम्ही तिसरी आघाडी म्हणून कार्य करत नाही. आम्ही इंडियाच्या बाजूनेही नाही आणि एनडीएच्या बाजूने पण नाही. पण लोकांना नवीन पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. काँग्रेसने 50 वर्ष तर, भाजपने दहा वर्षे सत्ता भोगली. पण लोकांच्या पदरी निराशा आलेली आहे. आमच्या कामाची पद्धत बघून अनेक पक्षाने आमच्याशी संपर्क साधलेला आहे. आम्ही 50% काम पूर्ण केलेलं आहे. राज्यात बीआरएसचे 14 लाखाहून अधिक पदाधिकारी झालेले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.