Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digvijay Singh : देशात लोकतंत्र नाही तर धनतंत्र; सर्व खेळ पैशांच्या जोरावर, दिग्विजय सिंहांचा भाजपाला टोला

काँग्रेसचे नेते आणि सरचिटणीस दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात आता जो खेळ झाला तो देशाला नवा नाही. 2017 पासून हे पैशांच्या जोरावर सुरू असल्याचे द्विग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

Digvijay Singh : देशात लोकतंत्र नाही तर धनतंत्र; सर्व खेळ पैशांच्या जोरावर, दिग्विजय सिंहांचा भाजपाला टोला
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 6:55 AM

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि सरचिटणीस दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात आता जो खेळ झाला तो देशाला नवा नाही.  2017 पासून हे पैशांच्या जोरावर सुरू असल्याचे द्विग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. भाजपाचा लोकशाही(Democracy) आणि भारतीय संविधानावर विश्वास नाही. महाराष्ट्रात पक्षांतर बंदी कायद्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. धर्माचा वापर हा राजकीय हत्यार म्हणून केला जात आहे. भारताचा तिरंगा हा खादीच्या कापडापासूनच तयार केला जातो. आता मात्र चीनमधून तिरंग्यासाठी कापड आयात करून त्यापासून तिरंगा तयार करण्यात येणार आहे. ज्या -ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षाचे सरकार आहे, त्यांच्यासोबत पूर्णत: पक्षपात केला जात असून, देशात आता लोकतंत्र नाही तर धनतंत्र आल्याची टीका दिग्विजय सिंह यांनी केली  आहे. तसेच त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या भाजपाच्या निर्णयावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. देशात सध्या लोकतंत्र नसून धनतंत्र आहे. फोडाफोडीचे राजाकराण सुरू आहे. महाराष्ट्राने आता जो खेळ पाहिला तो आताचा नाही तर त्याची सुरुवात ही 2017 पासून झाली आहे. हे सर्व पैशांचे खेळ आहे. राज्यात पक्षांतर बंदी कायद्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. धर्मचा वापर हा राजकीय हत्यार म्हणून सुरू आहे. गोव्यामध्ये काँग्रेसचे जे नेते भाजपासोबत गेले, त्यांच्यापैकी किती जणांच्या मागे ईडीची चौकशी सुरू होती याची माहिती घ्यावी लागेल असे म्हणात त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

…हा तर फडणवीसांचा अपमान

राज्यामध्ये काही दिवसांपूर्वीच नवे सरकार आले आहे. सर्वांना वाटत होते की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने सर्वांनाच अनअपेक्षीत धक्का दिला आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यावरून देखील द्विग्विजय सिंह यांनी टोला लगावला आहे.देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जाणून बुजून उपमुख्यमंत्रीपद देत अपमानित केलं आहे. त्यांच्या जागी मी असतो तर हे पद कधीच घेतले नसते असं द्विग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.