Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravikant Tupkar : आताच हस्तक्षेप करा, नाहीतर राज्यात कायदा नि सुरक्षेचा प्रश्न गंभीर..रविकांत तुपकर यांनी का दिला राज्य सरकारला इशारा..

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काय दिला इशारा..

Ravikant Tupkar : आताच हस्तक्षेप करा, नाहीतर राज्यात कायदा नि सुरक्षेचा प्रश्न गंभीर..रविकांत तुपकर यांनी का दिला राज्य सरकारला इशारा..
राज्य सरकारला इशाराImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 9:27 PM

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. विमा कंपनीच्या (Insurance Company) मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांच्या (Farmer) संतापाचा कडेलोट होण्याअगोदर राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law And Order) प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा ही त्यांनी दिला आहे. विमा कंपनीच्या मनमानीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने दबाव न टाकल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

AIC विमा कंपनीवर शेतकरी प्रचंड नाराज आहेत. या कंपनीने प्रिमियमपेक्षा ही कमी पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली आहे. या कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानी पुसल्या गेली आहेत. अनेक शेतकरी विम्यापासून वंचित असल्याचा दावा त्यांनी केला.

या कंपनीच्या कारभाराच्या पद्धतीवरही शेतकरी नाराज असल्याचे तुपकर म्हणाले. या कंपनीने परस्पर पंचनामे केल्याचा आरोप करण्यात आला. विमा कंपनीने कृषी विभागाने केलेले पंचनामे गृहीत धरले नाहीत. परस्पर विमा दावा अर्ज भरल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

विमा कंपनीच्या या मनमानी काराभाराविरोधात कृषी विभागानेही कडक पाऊल उचलले आहे. ही कंपनी कृषी विभागालाही जुमानत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कंपनीविरोधात कृषी अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे तुपकर यांनी सांगितले.

या कंपनीने राज्यातील शेतकऱ्यांकडून विम्याच्या प्रिमियम पोटी मोठी रक्कम जमा केली. राज्य शासनाकडूनही कंपनीला मदत मिळाली. आता या कंपनीने संपूर्ण असहकार्याचे धोरण स्वीकारले आहे. कंपनीचे कार्यालय बंद राहणार असून प्रतिनिधींचे मोबाईलही बंद ठेवण्यात येणार असल्याचा दावा तुपकर यांनी केला.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी या विमा कंपनीवर दबाव टाकावा. शेतकऱ्यांना पीक विम्याची संपूर्ण रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केली. अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होईल, असा इशारा तुपकर यांनी दिला.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.