Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सल्ला देणं भोवलं?, रोहित पवार यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांची पहिल्यांदाच टीका; काय म्हणाले?

अन्नपुरानी नावाचा तमिळ सिनेमा आलाय. दक्षिणेतील दोन सुपरस्टार त्यात काम करत आहेत. त्यात त्यांनी वाल्मिकी रामायणातील एक श्लोक म्हणून दाखवला. त्याचा अर्थ समजून सांगितला. तो पाहायचा असेल तर पाहा. मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलं नाही. पण आज अभ्यासाला महत्त्व नाही तर भावनांना महत्त्व आहे. जर माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सल्ला देणं भोवलं?, रोहित पवार यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांची पहिल्यांदाच टीका; काय म्हणाले?
jitendra awhad and rohit pawarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 1:51 PM

शिर्डी | 4 जानेवारी 2023 : देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये. नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेऊ नये, अशा शब्दात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार यांच्या या टीकेचा जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. मी रोहित पवार यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा हल्लाच जितेंद्र आव्हाड यांनी चढवला आहे. आव्हाड यांनी पहिल्यांदाच थेट रोहित पवार यांच्यावर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राम हा मांसाहारी होता, असं विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. आव्हाड यांच्या या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. भाजपने आव्हाड यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन होत आहे. आव्हाड यांच्या विधानाने राजकारण तापल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच आपलं विधान हे ओघातून झालं आहे, असं सांगतानाच आव्हाड यांनी वाल्मिकी रामायण आणि इतर पुस्तकांचा संदर्भ देत त्या पुस्तकात आपण जे म्हटलंय तेच म्हटल्याचाही दावा केला आहे.

ते अजून लहान आहेत

रोहित पवार यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता आव्हाड यांनी रोहित पवार यांनाच फटकारलं आहे. रोहित पवार काय बोलतात त्याला मी फार महत्त्व देत नाहीत. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही. ते अजून लहान आहेत. पहिली टर्म आहे त्यांची, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांना फटकारलं आहे.

आव्हाडांकडून पुरावे

कधीही मी इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोललो. राम आमचा पांडूरंग आहे. राम मांसाहारी होते, हे मी बोललो. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो, वाल्मिकी रामायणात सहा स्कंद आहेत. त्यात अयोध्या स्कंदातील सर्ग 552 आणि श्लोक 10, श्लोक 102 आहे. तो मी इथे वाचणार नाही. ते वाचून मला पुन्हा वाद वाढवायचा नाही. 1891चं डॉक्युमेंट आहे. वेस्ट बेंगालमध्ये प्रिंट केलेलं आहे. ममतानाथा दत्त यांनी अनुवाद केलं आहे. तेही मी वाचणार नाही. तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर कॉपी देतो. त्यात काय म्हटलं ते पाहा आणि मी काय म्हटलं ते पाहा, असं म्हणत आव्हाड यांनी पुरावेच दिले.

वाल्मिकी रामायणातील गोष्टींना आक्षेप आहे का?

आयआयटीतील पोरांनी मला अनेक पेपर्स पाठवले. का पाठवले हे माहीत नाही. त्या त्या काळात रामायणातील श्लोकांचा कसा अनुवाद झाला, ते माझ्याकडे उपलब्ध आहे. वाल्मिकी रामायणात जर काही लिहिलं असेल तर त्याला कुणाचा आक्षेप आहे का ? असेल तर सांगा, असा आव्हानच त्यांनी दिलं.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.