Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या ‘त्या’ एका वाक्याने सारं बदललं, राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा शब्द दिला

Farmer Meets Raj Thackeray : शेतकरी भेटायला आले, राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली, पण 'त्या' एका वाक्याने सारं बदललं...

शेतकऱ्यांच्या 'त्या' एका वाक्याने सारं बदललं, राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा शब्द दिला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 12:28 PM

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे विविध लोकांच्या भेटी घेत आहेत. स्थानिक मनसेचे पदाधिकारी, शेतकरी हे राज ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत. यात शेतकरी भेटी दरम्यानचा एक प्रसंग सध्या नाशकात चर्चेचा विषय बनला आहे.

‘त्या’ एका वाक्याने सारं बदललं

राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शेतकरी आले होते. यावेळी या शेतकऱ्यांना राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला. मनातील खंत बोलून दाखवली. तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येता? ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असं आश्वासन दिलं होतं, त्यांनाच तुम्ही मतदान केलं ना? जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता. याचं भान तुम्ही ठेवायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या या एका मागोमाग येणाऱ्या प्रश्नांना शेतकऱ्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. शेतकरी सगळे आता तुमच्यामागे असल्याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलं. त्यानंतर राज ठाकरे यांनीही आपला राग आवरता घेतला.

येत्या तीन चार दिवसांत शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी आश्वासन दिलं.

सर्वसामान्य लोक राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला गर्दी करतात. पण त्याचं रुपांतर मतांमध्ये होत नाही, हे निवडणुकांमध्ये वारंवार दिसतं. हीच खंत आज राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांसमोर बोलून दाखवली.

सुरत चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. जमीन अधिग्रहित करताना विचारलं नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मी ठाम पणे तुमच्या पाठीशी उभा, असा शब्द राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.

नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुली विरोधात काही शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. कर्ज भरण्यासाठी बँकेकडून दिलासा मिळण्याची मागणी करणार आहेत. काही दिवसांपूर्वी देखील शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

मोठ्या थकबाकीदारांना जिल्हा बँक पाठीशी घालत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. बँकेचे कर्ज भरण्यासाठी शेतकरी तयार आहेत. मात्र वेळ देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. एकीकडे अवकाळीमुळे शेतीचं नुकसान झालंय. तर दुसरीकडे बँकेची वसूली अशा दुहेरी संकटात शेतकरी सध्या सापडला आहे. यावर राज ठाकरे यांनी तोडगा काढवा, असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....