Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी कधीही रेल्वेचं तिकीट काढलं नाही, कारण…; रामदास आठवले यांचा भरसभेत खुलासा

Ramdas Athwale on Railway ticket : असेल देशात नरेंद्र मोदींची आंधी, तर मला मिळेल मंत्रिमंडळात संधी!; रामदास आठवले यांची कविता तुफ्फान व्हायरल...

मी कधीही रेल्वेचं तिकीट काढलं नाही, कारण...; रामदास आठवले यांचा भरसभेत खुलासा
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 11:37 AM

नाशिक : अनेकदा अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असतात. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंडही आकारला जातो. पण राजकीय मंडळी विनातिकीट प्रवास करत असतील असं कुणाच्या ध्यानी मनीही येऊ शकत नाही. पण केंद्रीय राज्य मंत्र्यांनी आपण विना तिकीट प्रवास करत असल्याचं भर सभेत सांगितलं आहे. केंद्रीय रामदास आठवले यांनी आपण विनातिकीट प्रवास केल्याचं सांगितलं आहे.

मी काही कधी रेल्वेचे तिकीट काढत नव्हतो. कारण प्रत्येकवेळी स्टेशनवर माझ्या स्वागताला शंभर दीडशे माणसं असायची. मग कोणता टीसी मला तिकीट विचारेल? त्यामुळे मी कधीही रेल्वेचं तिकीट काढलं नाही, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये दलित पँथर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पँथर चळवळीतील अग्रगण्य नेत्यांचां सत्कार सोहळा पार पडला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शालिमारमधल्या कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम पार पडला.

पँथर सुवर्ण महोत्सव सोहळ्यात भाषण करताना रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिपदावरही त्यांनी भाष्य केलं.

जर देशात असेल नरेंद्र मोदी यांची आंधी तर मला का मिळणार नाही मंत्री मंडळात संधी जर आमच्यावर कुणी केला अत्याचार, तर आम्ही करतो गावबंदी

तुम्हाला प्यायचा असेल, तर प्या आमचा चहा तुम्हाला नसेल प्यायचा, तर पेऊ नका आमचा चहा पण आमच्याकडे चांगल्या नजरेने पाहा

मी कधी बोललो नाही खोटं मला पँथरने केले मोठं माझ्या नावाने अनेक लोकांनी मोडली बोटं तरी पँथरने मला केलं मोठं मी कधीच कुणाची केली नाही चाकरी आय बहिणींनी दिली मला भाकरी

मला आवडायची नाशिकची चिकन करी म्हणून मी जायचो यांच्या घरी जय भीम चा बुलंद आवाज मी ऐकत होतो गाण्यात म्हणून मी चालत होतो पँथरच्या पाण्यात

आम्ही कुणाच्या विरोधात नाही पण एकदा आम्ही खवळलो, की कुणाच्या बापाला घाबरत नाही

रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये म्हटलेली केलेली कविता सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर ही कविता तुफ्फान व्हायरल होत आहे.

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....