Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी काँग्रेसनं भाकरी फिरवली, बीड जिल्हाध्यक्षपदावर राजेश्वर चव्हाण यांची निवड, इच्छुकांची प्रतिक्रिया काय?

राज्यात नुकतीच नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पार पडली. या निवडणुकीत बीड (Beed) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अपयशाला सामोरं जावं लागलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसनं भाकरी फिरवली, बीड जिल्हाध्यक्षपदावर राजेश्वर चव्हाण यांची निवड, इच्छुकांची प्रतिक्रिया काय?
बीड जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 6:18 PM

बीड : राज्यात नुकतीच नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पार पडली. या निवडणुकीत बीड (Beed) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. बीडमधील नगरपंचयात निवडणुकीच्या निकालाची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती. बीडमधील नगरपंचायत निवडणुकीतील पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं संघटनात्मक फेरबदल सुरु केले आहे. बीड जिल्हा राष्ट्रवादीत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण (Rajeshwar Chavan) यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे यांना अखेर डीच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या स्पर्धेत असलेले नुकतेच काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आलेले राजकिशोर मोदी आणि राष्ट्रवादी माजी आमदार पृथ्वीराज साठे हे मात्र नाराज झाले आहेत. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेले अपयश पाहता राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होण्याची चर्चा होती. शिवाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील काही महिन्यांपूर्वी बीडमध्ये बैठक घेतली होती. त्यावेळी जिल्हाध्यक्ष बदलण्याचा इशारा दिला होता. आज अखेर नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून राजरेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत राजेश्वर चव्हाण?

अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील राजेश्वर चव्हाण यांची राजकीय कारकीर्द चांगली आहे. राजेश्वर चव्हाण हे म्हाडाचे संचालक राहिले आहेत. शिवाय ते जिल्हा परिषदचे माजी सदस्य आहेत. सध्या ते अंबाजोगाई तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुंबईत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

जिल्हाध्यक्ष निवडीनंतर नाराजीचे सूर..

बीड जिल्हा राष्ट्रवादीच्या नूतन जिल्हाध्यक्षाच्या निवड स्पर्धेत अनेक जण इच्छुक होते. काँग्रेसला हात देऊन नुकतीच मनगटात राष्ट्रवादी घड्याळ घातलेले राजकिशोर मोदी आणि केजचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठा पेच निर्माण झाला आहे.

इतर बातम्या:

मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपची मारहाण, अटकेसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा धडकला

अनिल देशमुखांना एक आणि नवाब मलिकांना वेगळा न्याय, लाड करण्याचं कारण काय? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.