महायुतीच्या अपयशाला नरेंद्र मोदी आणि शाह जबाबदार; मनसे नेत्याच्या विधानाने खळबळ

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात महायुतीचा मोठा पराभव झाला आहे. तर तुलनेने महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा महायुतीचा दावा फेल गेला आहे. त्यामुळे आता आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.

महायुतीच्या अपयशाला नरेंद्र मोदी आणि शाह जबाबदार; मनसे नेत्याच्या विधानाने खळबळ
pm modi Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 3:39 PM

लोकसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड अपयश मिळालं आहे. त्यानंतर आता टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबतचं मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार असल्याचा दावा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी थेट भूमिका जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसेच्या या भूमिकेवर महायुतीचे नेते काय म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. लोकसभेत आमचा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी होता. बाकी महायुतीतल्या इतर पक्षाशी आमचा सबंध नाही. लोकसभे निवडणुकीत महायुतीला जे अपयश मिळालं आहे, त्याला फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी, अमित शाह जबाबदार आहेत. मोदी आणि शाह यांनी काही टोकाच्या भूमिका घेतल्या. त्या जनतेला पटल्या नाहीत, असं सांगतानाच अजित पवार यांना सोबत घेण्याचा फटका महायुतीला बसला आणि या पुढेही बसेल, असा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.

मनसे स्वबळावर लढणार

मनसे स्वबळावर लढणार की महायुतीत लढणार? असा सवाल प्रकाश महाजन यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी मनसे महायुतीत लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी आम्हाला 200 ते 250 जागा लढवण्याच्या तयारीला लागण्यास सांगितलेलं आहे. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत, असं महाजन म्हणाले.

पवारांचा उतरता काळ सुरू होईल

आरएसएसचे मुखपत्रात जे लिहीलय ते अगदी खरं आहे. शरद पवार यांना 8 खासदार मिळाले आहे हा उच्चांक झाला. आता त्यांचा उतरता काळ सुरू होईल, असा दावाही त्यांनी केला.

कधी तरी तावडेंना विचारा

फोडफोडीच्या राजकारणाचा महायुतीला फटका बसला, देवेंद्र फडणवीस कसे वागले हे कधीतरी विनोद तावडेंना जाऊन विचारा. इथेच सगळं फेडाव लागणार आहे. राज्यात कधी नव्हे ते फतवे निघाले आहेत. मतदान झालं आहे. आम्ही जातपात मानत नाही. आमचा एकच धर्म तो म्हणजे हिंदू धर्म. आम्ही जातपात विचारत पण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.