Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज पुन्हा आमने-सामने

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुन्हा आमने-सामने येणार आहेत. दरम्यान आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत बिहारमध्ये 8.14 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज पुन्हा आमने-सामने
काँग्रेसच्या हातून पंजाब निसटतंय तर मोदींचा मार्ग सुकर होतोय
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 11:56 AM

पाटना: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत बिहारमध्ये 8.14 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुन्हा आमने-सामने येणार आहेत. पंतप्रधान मोदी आज फोर्ब्सगंज आणि सहरसा इथं रॅली काढून मतदारांना संबोधित करणार आहेत. तर राहुल गांधी कटिहार आणि किशनगंज मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. तर मधेपुरा जिल्ह्यातील बिहारगंज आणि अररियामध्ये राहुल गांधी यांच्या रॅली होणार आहेत. (PM Narendra Modi and Rahul Gandhi again face off today in Bihar )

तेजस्वी यादवांकडून स्वागत, आश्वासनांचीही आठवण!

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्वीट करुन पंतप्रधान मोदी यांचं बिहारमध्ये स्वागत केलं आहे. ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, बिहारची समस्त जनता पुन्हा एकदा आपल्या बिहार दौऱ्याचं स्वागत करते आहे. तुम्हाला एक पत्र लिहिलं आहे. आशा करतो की गेल्या 6 वर्षात तुम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कराल’, अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

दुसऱ्या टप्प्यात सकाळी 10 वाजेपर्यंत 8.14 टक्के मतदान

बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 10 वाजेपर्यंत 8.14 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. त्यामुळं सकाळच्या सत्रात मतदान धिम्या गतीनं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.

तेजस्वी, तेजप्रताप यांचं भविष्य आज मतदान यंत्रात!

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु झालं आहे. एकूण 17 जिल्ह्यातील 94 मतदारसंघात मतदान होत आहे. एकूण 1 हजार 463 उमेदवारासाठी आज मतदान होत आहे. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय जनता दल अर्थात RJDचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचं भविष्यही आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 1 हजार 463 उमेदवार रिंगणा आहेत. त्यापैकी 143 महिला तर एक ट्रान्सजेंडर उमेदवार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 2 कोटी 85 लाख 50 हजार 285 मतदार आपला हक्क बजावतील. यात 1 कोटी 35 लाख 16 हजार 271 महिला तर 980 ट्रान्सजेंडर मतदार आहेत.

संबंधित बातम्या:

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु, तेजस्वी आणि तेजप्रताप यांचं भविष्य आज मतदान यंत्रात बंद होणार

10 राज्यांतील 54 विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक, मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष

PM Narendra Modi and Rahul Gandhi again face off today in Bihar

हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.