Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राणा बोलले ते खरंच, सत्य कडूच असतं!”, हनुमान भक्तीचा दाखला देत सामनातून खोक्यांच्या वादावर भाष्य

: आजच्या सामनाच्या अग्रलेखातून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू याच्यातील वादावर भाष्य करण्यात आलं आहे.

राणा बोलले ते खरंच, सत्य कडूच असतं!, हनुमान भक्तीचा दाखला देत सामनातून खोक्यांच्या वादावर भाष्य
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 10:02 AM

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) याच्यातील वादावर भाष्य करण्यात आलं आहे. हनुमान भक्तीचा दाखला देत रवी राणा यांच्या विधानाची पाठराखण करण्यात आली आहे. तर बच्चू कडू यांच्यावर टीका करण्यात आली आहे. “रवी राणा (Ravi Rana) हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल?”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल. आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार?, असं म्हणत बच्चू कडूंवर टीका करण्यात आली आहे.

‘खोके’ आमदार म्हटल्यामुळे आपली अप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे आपण खोके घेतल्याचे पुरावे द्या, नाही तर परिणामांना सामोरे जा, असा दम कडू यांनी भरला. अर्थात राणा यांच्या दिलगिरीनंतर अमरावतीमधील सभेत त्याच राणांना कडू यांनी पहिली वेळ म्हणून माफीही दिली. म्हणजे आधी मोठय़ा आवेशात राणांचे बखोट धरले व नंतर ते सोडून दिले. तरी बच्चू कडू यांची वेदना समजून घेतली पाहिजे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.