Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देशाच्या पहिल्या सहकारी कारखान्याच्या उभारणीतील पहिली 2 नावं घेताना काहींना अॅलर्जी’, पवारांचा विखेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात विखे कुटुंबाला अप्रत्यक्ष टोले लगावले आहेत.

'देशाच्या पहिल्या सहकारी कारखान्याच्या उभारणीतील पहिली 2 नावं घेताना काहींना अॅलर्जी', पवारांचा विखेंना टोला
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 1:46 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात विखे कुटुंबाला अप्रत्यक्ष टोले लगावले आहेत. “देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगरमधील प्रवरा कारखानाच आहे. त्याच्या उभारणीतील पहिली दोन नावं म्हणजे अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे ही आहेत. पण नावं घेताना काहींना अॅलर्जी होते,” असा टोला पवारांनी लगावला. विखे कुटुंबाकडून प्रवरा साखर कारखान्याचं श्रेय कायमच पद्मश्री विठ्ठलराव विखेंना देण्यात येते. मात्र, इतर नावांचा उल्लेख होत नाही, असाच पवारांचा हे बोलण्यामागील रोख असल्याचं बोललं जातंय (Sharad Pawar criticize Vikhe Family over credit of First Cooperative Sugar Factory in India).

शरद पवार म्हणाले, “देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरचाच आहे. हा कारखाना उभा करण्यात पहिले दोन नावं म्हणजे धनंजय गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे यांची आहेत. पण ही नाव घेताना अनेकांना अॅलर्जी होते.”

“देशाच्या कृषी क्षेत्राला प्रचंड योगदान देणाऱ्या आणि सहकारी चळवळीला दिशा देणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने संबंध वर्षांत विविध विषयांवर विविध चर्चासत्रे चालवावीत. या संकल्पनेची आम्ही आज सुरुवात करत आहोत. अण्णासाहेब शिंदे आणि चव्हाण प्रतिष्ठानचा घनिष्ठ संबंध आहे. संस्थापकांच्या यादीमध्ये आपल्याला त्यांचं नाव बघायला मिळेल. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष म्हणून काहीकाळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि विविध प्रकारच्या बैठकांना नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केलं,” असंही पवारांनी सांगितलं.

‘देशामध्ये हरितक्रांती आणण्यात अण्णासाहेब शिंदेंचा महत्त्वाचा वाटा’

शरद पवार म्हणाले, “देशामध्ये हरितक्रांती आणण्यात ज्या लोकांचं योगदान होत त्यात बाबू जगजीवनराम, सी. सुब्रहमण्यम यांच्या जोडीने अण्णासाहेब शिंदेंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हरितक्रांती प्रत्यक्षात आणण्याच्या उपक्रमात अखंडता आणि सातत्य अण्णासाहेबांमुळेच शक्य झालं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अण्णासाहेब शिंदे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. यशवंतराव चव्हाणांना अण्णासाहेबांबद्दल आस्था होती.”

“आज शेतकऱ्यांना थंडीत 60 दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित होती. आजचे राज्यकर्ते त्यातून काही शिकतील अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो,” असं म्हणत पवारांनी मोदी सरकारला टोला लगावला.

हेही वाचा :

सीमावादावर शेवटचं हत्यार कोणतं? शरद पवार म्हणाले…..

गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही; शरद पवारांचा अमित शाहांवर निशाणा

शेतकऱ्यांविषयी ‘तो’ प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला, म्हणाले…

व्हिडीओ पाहा :

Sharad Pawar criticize Vikhe Family over credit of First Cooperative Sugar Factory in India

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....